शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सदस्यांची नियुक्ती सुरु; तीन महिन्यात वक्फ बोर्ड अस्तित्वात येणार : नलाब मलिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 12:43 IST

जिल्हास्तरावर वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. 

ठळक मुद्देबोर्डाचे उत्पन्न वाढविणे हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. बोर्डावर कायमस्वरूपी सीईओ नियुक्त करण्यात येणार

औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी सीईओ नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वक्‍फमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मलिक यांनी सोमवारी सकाळी सुभेदारी विश्रामगृहात वक्‍फ बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील वार्षिक योजनेच्या बैठकीसाठी निघून गेले. दुपारी मोजक्याच पत्रकारांसोबत बोलताना ते पुढे म्हणाले की, आज बोर्डाचा संक्षिप्त आढावा घेतला. बोर्डातील रेकॉर्ड अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने ते डिजिटल पद्धतीने सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्मचारी भरतीसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. १४० कर्मचारी भरतीसाठी शासने मंजुरी दिलेली आहे. येत्या काही दिवसांत थोडे- थोडे करून ही भरती करण्यात येईल. जिल्हास्तरावर वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. 

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या जागांबाबत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या विषयावर मलिक यांनी सांगितले की, इम्तियाज जलील आता बोर्डाचा एक भाग आहेत. बोर्डाचे उत्पन्न वाढविणे हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. भाडे वाढवून न देणाऱ्या मंडळींवर कारवाई करायला हवी. एखादी मालमत्ता लीजवर देत असताना नियमांचे पालन झालेच पाहिजे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ बंद असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता मलिक म्हणाले की, महामंडळातर्फे यापूर्वी काही नागरिकांना कर्ज देण्यात आले होते. त्याची परतफेड आजपर्यंत झालेली नाही.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकAurangabadऔरंगाबाद