शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विद्यापीठाच्या परीक्षेच्या ७ दिवस आधीच भरावे लागतील अर्ज; परीक्षा कक्षात सीसीटीव्ही अनिवार्य

By योगेश पायघन | Updated: January 2, 2023 18:56 IST

परीक्षा झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी परीक्षेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, परीक्षा सुरू होऊनही विद्यार्थ्यांचे परीक्षा फाॅर्म न भरणारी महाविद्यालये समोर आली. त्यामुळे ऐनवेळी अडचणी येतात. त्या टाळण्यासाठी उन्हाळी परीक्षेच्या सात दिवस आधीपर्यंतच अर्ज भरण्याची मुभा देण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत, तर दुसरीकडे निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. बीएसस्सीच्या ४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाचा प्रयत्न आहे. काही तांत्रिक त्रुटी आल्या. मात्र, विद्यापीठाचा ५ टक्के दोष असेल, तर २५ टक्के दोष महाविद्यालयांचा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज जबाबदारीने अचूक व वेळेत भरणे अपेक्षित आहे. चुका झाल्या त्या मान्य आहेत. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नाही. यात चूक असणाऱ्यांवर कारवाई होईल; तसेच महाविद्यालयांनी जबाबदारी ओळखली पाहिजे. तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही कुलगुरू म्हणाले.

परीक्षेवर आता तिसरा डोळापरीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या २६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत परीक्षा कक्षात सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयाला परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. त्यामुळे उन्हाळी परीक्षेपूर्वी परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्या. अन्यथा परीक्षा केंद्र दिले जाणार नसल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी महाविद्यालयांना कळवले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र