शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रस्त्याला आले नदीचे स्वरूप; कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धापूरकरांची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 12:58 IST

मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची उडाली तारांबळ

ठळक मुद्देअनेकांची वाहने पाण्यामुळे मध्येच बंद पडल्याने तारेवरची कसरत

अर्धापूर ( नांदेड ) : शहरातून जात असलेल्या तामसा-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरु असल्याने जोरदार पावसात रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. 

अर्धापूर ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. हा महामार्ग तामसामार्गे जातो. रस्त्याचे काम रूद्रायणी या कंपनीमार्फत सुरु असून खोदकाम केल्यामुळे रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. या रस्त्याची दोन्ही बाजू खोदून ठेवण्यात आली आहेत. त्यात पाणी साचले असून निचरा न झाल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. या रस्त्यावर लहान ,लोण, चाभरा अनेक गावे असून येथील ग्रामस्थ, व्यवसायिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अर्धापूर व नांदेड असा प्रवास करतात. 

पूर्वी असलेला डांबरी रस्ता खोदून ऐन पावसाळ्यात या रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्त्यावर सगळीकडे पाणी साचत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी या रस्त्यावरून वाहन चालवणे तर सोडाच, परंतु चालणे सुध्दा अवघड बनले आहे. तसेच अनेक दुचाकीधारक रस्त्यावर घसरून पडले आहेत तर अनेकांच्या मोटरसायकल पाण्यातच बंद पडल्याने गाडी ढकलत आणावी लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

वेळत काम करायचे नाही तर खोदले का ? वाहनचालकांच्या व नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी. - संजय लोंणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड