शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

लातूरच्या पाण्यासाठी न्यायालयात अपिल करू

By admin | Updated: March 2, 2016 23:19 IST

लातूर : लातूरचा पाणी प्रश्न किती बिकट आहे, हे मी समजू शकतो. कारण या अवस्थेतून उस्मानाबादकर गेले आहेत. लातूर शहराच्या ३० किमी परिघात १७० कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे

लातूर : लातूरचा पाणी प्रश्न किती बिकट आहे, हे मी समजू शकतो. कारण या अवस्थेतून उस्मानाबादकर गेले आहेत. लातूर शहराच्या ३० किमी परिघात १७० कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे. तेथील स्थानिकांच्या विरोधी मताला सामंजस्याने बदलून तेथील अर्धे पाणी टँकरने शहरवासियांना तातडीने देता येऊ शकते. तर कायमस्वरुपी योजनेसाठी उजनीशिवाय पर्याय नसल्याने पाणीयोजनेच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल. या दोन्ही मुद्यांवर राज्य शासनाने काही निर्णय नाही घेतले तर आम्ही न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याची माहिती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, उस्मानाबादला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ महिन्यापूर्वी बैठक झाली होती. त्यात उजनी-उस्मानाबादच्या पाईपलाईनवरुन आठ एमएलडी पाणी लातूरसाठी उपसा करायचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याला मुख्यमंत्री फडणवीस स्वत: अनुकूल होते. आमची क्षमता १६ एमएलडी पाणी उपशाची आहे. परंतु आम्ही आठ एमएलडीच उचलतो. त्यातले सहा एमएलडी पाणी आम्हा उस्मानाबादकरांना पुरते. लातूरने आठ एमएलडी उपसा केला तर आम्ही त्यातले दोन एमएलडी पाणी कळंबसह उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांना पुरले असते. त्यामुळे आम्हीही या योजनेच्या प्रतिक्षेत होतोे. परंतु काय झाले कळले नाही, ही योजना मागे पडली अन् आमचेही नुकसान झाले. आता पाणीटंचाईत अडकलेल्या लातुरातून मला अनेकांचे दूरध्वनी आले. त्यामुळे मी ती पहायला आलो. टंचाई भीषण आहे. परंतु ही लढाई सर्वांनी लढायला हवी. उस्मानाबादच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आम्ही विद्यार्थी सहाय्यता निधी उभारणार असल्याची माहिती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, उस्मानाबादमध्ये दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त निधी उभारला. विद्यापीठांच्या कुलगुरुंशी आम्ही चर्चा केली. उस्मानाबादला विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्राच्या नावाने विद्यापीठाचे एक विशेष खाते उघडण्यात आले. त्या खात्यावर मी पहिल्यांदा माझे एक महिन्याचे मानधन जमा केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा दोन कोटीचा पगार दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही देऊ पहात आहेत. समाजातील दानशूर लोक मदत करीत आहेत. हीच कल्पना आम्ही लातूर जिल्ह्यात राबविणार आहोत. स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर आणि लातूर उपकेंद्राचे संचालक डॉ.डी.एन. मिश्रा यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत अकाऊंट उघडण्यात येणार आहे. त्यानंतर उस्मानाबादच्या धर्तीवर अशाच पध्दतीने लातुरातील शासकीय कर्मचारी आणि दानशुर व्यक्तींना आवाहन करण्यात येईल. यातून जमा झालेली रक्कम ही दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरली जाईल. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले.