शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तिसऱ्या लाटेची चिंता ही स्वाभाविक; राज्य सरकारकडून उपाययोजना करणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 16:36 IST

Corona Virus : तिसऱ्या लाटेसंदर्भात पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षणात साथरोगाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढविणार

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट पाचपट राहिली. परंतु तरीही महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक राहिली. त्याची नोंद जगभरात झाली. तिसऱ्या लाटेसंदर्भात पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त होत आहे. रुग्णसंख्येत वाढ होऊ नये, यादृष्टीने ही चिंता स्वाभाविक आहे. याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, त्यादिशेने उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे वैद्यकीय शिक्षणात साथरोगाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी (दि.१६) औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) कोविड-१९ आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लावण्यात आलेल्या निर्बंधांविषयी अमित देशमुख म्हणाले, हा राजकीय निर्णय नाही, तर तज्ज्ञ, टास्क फोर्सचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जातो. याचे पालन केल्यामुळेच दररोज हजारांवर रुग्ण आढळणाऱ्या शहरांतील रुग्णसंख्या दोन अंकी झाली आहे. तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. पण ती येऊ नये अशी आशा असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, काँग्रेस सेवादलाचे विलास औताडे, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांची उपस्थिती होती.

रिक्त पदे मुदतीत भरणारवैद्यकीय उपकरणांसंदर्भात प्रशिक्षणही गरजेचे आहे. सीटी स्कॅन, एमआरआय, व्हेंटिलेटर आदींसंदर्भातील कामांचे सर्टिफिकेट कोर्स सुरू केले आहेत. जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय या संकल्पनेत आतापर्यंत ६ नवी महाविद्यालये मंजूर केली आहेत. इतर नवीन वैद्यकीय महाविद्यालये विचाराधीन आहेत. डाॅक्टर, परिचारिकांची संख्या वाढविण्यासाठी व्यवस्था उभी केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे. ती विहित मुदतीत भरली जातील, असे अमित देशमुख म्हणाले.

केंद्र सरकारवर निशाणाकेंद्र सरकार हे दिशा हरवलेले सरकार आहे. पेट्रोल, डिझेल हे जीएसटीत आणले पाहिजे. परंतु ते आणले जात नाही. चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करण्यात आला आहे, असे म्हणत अमित देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या