शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

अभियांत्रिकी विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांना आता ‘बारकोड’

By admin | Updated: September 16, 2014 01:36 IST

औरंगाबाद : अभियांत्रिकी विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांना आॅक्टोबरपासून ‘बारकोड’ लावण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला आहे.

औरंगाबाद : अभियांत्रिकी विद्याशाखेच्या उत्तरपत्रिकांना आॅक्टोबरपासून ‘बारकोड’ लावण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी विद्याशाखेचा हा प्रायोगिक तत्त्वावर घेतलेला निर्णय यशस्वी झाल्यास पुढे सर्व विद्याशाखांना ‘बारकोड’ पद्धत अवलंबिली जाणार आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा विद्यापीठात १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, सर्व पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधनाचे काही प्रश्न आहेत. ते समजून घेतले. काय करता येईल, त्याचा अभ्यास केला व निर्णय घेतले. अभियांत्रिकीची परीक्षा आणि निकालाबाबत थोडी ओरड झाली. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यापुढे निकाल वेळेत लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांनी सहकार्य करायला पाहिजे. जे प्राध्यापक या कामास नकार देतील, त्यांना नोटिसा बजावल्या जातील. आता प्रायोगिक तत्त्वावर अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांना ‘बारकोड’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आॅक्टोबरपासून हा निर्णय अंमलात आणला जाईल. त्यानंतर सर्वच विद्याशाखांसाठी ‘बारकोड’ पद्धत लागू केली जाईल. विज्ञान व सामाजिकशास्त्रे विभागातून प्रत्येकी ४ याप्रमाणे एकूण ८० कोटींचे ८ संशोधन प्रस्ताव नुकतेच यूजीसीकडे सादर करण्यात आले आहेत. शिवाय व्यक्तिगत २० कोटींचे प्रस्ताव यूजीसी व विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. गरजेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. सध्या विद्यापीठ परिसरात २४० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यानंतर २०११ पासून बंद पडलेली ‘गोल्डन ज्युबिली फेलोशिप’ ही सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले.