शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

मोबाईलने घेतलेला आणखी एक बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:44 IST

सोशल मीडियाचे वेड : संशयपिशाच्चाने उडवले पत्नीचे मस्तक!

श्यामकुमार पुरेसिल्लोड : ती सतत फोनवर बोलते, व्हॉटस् अ‍ॅप, यूट्यूब बघते, तिचा फोन नेहमी बिझी असतो, म्हणून तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील, अशा संशयाचे भूत डोक्यात घुसल्याने १४ आॅगस्ट रोजी पतीने चक्क पत्नीचे मुंडके छाटले होते. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून मी पत्नीवर खूप प्रेम करायचो, पण ती सतत फोनवर बोलायची, यामुळे तिचा खून केला. आता खून केल्याचा मला खूप पश्चाताप होतोय, असे आरोपीने पोलिस तपासात सांगितले.सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मागील आठवड्यात ही भयंकर घडली होती. खून करणारा आरोपी पती रवींद्र बनकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यासह मयत विवाहितेचा सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर यांना न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर सासू लंकाबाई साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर या दोघांना हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे. खून पतीने केला असला तरी तिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करणारे, शारिरीक, मानसिक त्रास देणारे सासू, सासरे, दीर, जाऊ हे सर्वच पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत.११ वर्षांपूर्वी झाले होते लग्नदेऊळगाव बाजार हे चारशे ते पाचशे उंबऱ्याचे गाव. येथील रहिवासी रवींद्र साहेबराव बनकर (३०) याचे ११ वर्षांपूर्वी मंगला हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्या संसारवेलीवर सागर (४) व भक्ती (६) ही दोन फुले उमलली. रवींद्र हा शेती व व्यापार करत असे. सर्व काही सुरळीत असताना त्यांच्या संसाराला संशयाच्या भुताने घेरले, अन् ही घटना घडली.वारंवार समजवूनही ती ऐकत नाही, यामुळे तिचे नक्की कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील. तिच्यात बदल होत नाही, ती मला फसवत आहे. समाजात मला तोंड दाखवायला जागा उरली नाही, अशा संशयातून त्याने टोकाचे पाऊल उचलले व रागाच्या भरात रात्री पत्नीचे मुंडके छाटले.पोलिसांचे कौशल्यघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, सहायक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप सावळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याच दिवशी खुनात वापरलेली धारदार कुºहाड पोलिसांनी जप्त केली व गुन्हा उघडकीस आणला. यापूर्वीही केळगाब येथे बापाने मुलाचा खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला होता.दोन्ही मुले अनाथपती-पत्नी हे सुखी संसाराच्या गाडीचे दोन चाके असतात. यातील एकही वाकले, त्याला तडा गेला तर काय होते. हे या घटनेवरून दिसून येते. मंगलाचा जीव गेला तर सागर आणि भक्ती हे सर्व काही असताना मातृवात्सल्यापासून अनाथ झाले आहेत.