शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने घेतलेला आणखी एक बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:44 IST

सोशल मीडियाचे वेड : संशयपिशाच्चाने उडवले पत्नीचे मस्तक!

श्यामकुमार पुरेसिल्लोड : ती सतत फोनवर बोलते, व्हॉटस् अ‍ॅप, यूट्यूब बघते, तिचा फोन नेहमी बिझी असतो, म्हणून तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील, अशा संशयाचे भूत डोक्यात घुसल्याने १४ आॅगस्ट रोजी पतीने चक्क पत्नीचे मुंडके छाटले होते. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून मी पत्नीवर खूप प्रेम करायचो, पण ती सतत फोनवर बोलायची, यामुळे तिचा खून केला. आता खून केल्याचा मला खूप पश्चाताप होतोय, असे आरोपीने पोलिस तपासात सांगितले.सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मागील आठवड्यात ही भयंकर घडली होती. खून करणारा आरोपी पती रवींद्र बनकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यासह मयत विवाहितेचा सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर यांना न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर सासू लंकाबाई साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर या दोघांना हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे. खून पतीने केला असला तरी तिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करणारे, शारिरीक, मानसिक त्रास देणारे सासू, सासरे, दीर, जाऊ हे सर्वच पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत.११ वर्षांपूर्वी झाले होते लग्नदेऊळगाव बाजार हे चारशे ते पाचशे उंबऱ्याचे गाव. येथील रहिवासी रवींद्र साहेबराव बनकर (३०) याचे ११ वर्षांपूर्वी मंगला हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्या संसारवेलीवर सागर (४) व भक्ती (६) ही दोन फुले उमलली. रवींद्र हा शेती व व्यापार करत असे. सर्व काही सुरळीत असताना त्यांच्या संसाराला संशयाच्या भुताने घेरले, अन् ही घटना घडली.वारंवार समजवूनही ती ऐकत नाही, यामुळे तिचे नक्की कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील. तिच्यात बदल होत नाही, ती मला फसवत आहे. समाजात मला तोंड दाखवायला जागा उरली नाही, अशा संशयातून त्याने टोकाचे पाऊल उचलले व रागाच्या भरात रात्री पत्नीचे मुंडके छाटले.पोलिसांचे कौशल्यघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, सहायक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप सावळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याच दिवशी खुनात वापरलेली धारदार कुºहाड पोलिसांनी जप्त केली व गुन्हा उघडकीस आणला. यापूर्वीही केळगाब येथे बापाने मुलाचा खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला होता.दोन्ही मुले अनाथपती-पत्नी हे सुखी संसाराच्या गाडीचे दोन चाके असतात. यातील एकही वाकले, त्याला तडा गेला तर काय होते. हे या घटनेवरून दिसून येते. मंगलाचा जीव गेला तर सागर आणि भक्ती हे सर्व काही असताना मातृवात्सल्यापासून अनाथ झाले आहेत.