शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

'मुख्यमंत्र्यांकडून जुन्याच योजनांची घोषणा'; अंबादास दानवेंनी थेट २०१६ सालचे निर्णयच दाखवले

By बापू सोळुंके | Updated: September 16, 2023 17:52 IST

सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली; विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: सात वर्षानंतर आज येथे झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ५९ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली. सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. शिवाय अर्थसंकल्पात मंजूर निधीशिवाय आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी मिळणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने मंत्रीमंडळाने मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने, पुसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्च करून आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक येथे पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेविषयी उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आला. पण पैठण तालुक्याची उपसा सिचंन योजना आणि गंगापुर तालुक्यातील ३७५ गावांकरीता वॉटर ग्रीड योजनेसाठी १०७५ कोटी महाविकास आघाडी सरकारनेच मंजूर केली होती. महाराष्ट्रात १३००हून अधिक आणि मराठवाड्यात ७८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. मंत्रीमंडळ बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केले. मात्र, मराठवाड्यातील जनतेसाठी विशेष पॅकेज न देता सन २०१६मध्ये केलेल्या घोषणांचाच पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला. नांदुर मधमेश्वर कालव्यासाठी २३४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील २१६४ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. यातील मराठवाड्यासाठी केवळ ७४ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारी कादगपत्रे सांगतात. जालना येथे सीड पार्कची घोषणा करण्यात आली. या सीड पार्कसाठी एमआयडीसीची जागा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती.

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी १४ हजार कोटीची तरतूद निव्वळ थापमराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी १४ हजार कोटी रुपयांची घोषणा म्हणजे निव्वळ थाप आहे. या योजनेच्या सर्वेक्षण करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. अद्याप सर्वेक्षणच झाले नाही, तर १४ हजार कोटी रुपयांची तरतूद कोणत्या कामासाठी केली, असा सवाल त्यांनी केला.

शहराच्या नामांतराचे श्रेय बाळासाहेबांनाचऔरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नांमातर करण्याच्या निर्णय राज्यसरकारने घेतला,याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या शहाराचे पहिले नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला होता. यामुळे याचे श्रेय केवळ बाळासाहेब आणि महााविकास आघाडी सरकारलाच जाते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद