शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

'मुख्यमंत्र्यांकडून जुन्याच योजनांची घोषणा'; अंबादास दानवेंनी थेट २०१६ सालचे निर्णयच दाखवले

By बापू सोळुंके | Updated: September 16, 2023 17:52 IST

सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली; विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: सात वर्षानंतर आज येथे झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ५९ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली. सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. शिवाय अर्थसंकल्पात मंजूर निधीशिवाय आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी मिळणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने मंत्रीमंडळाने मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने, पुसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्च करून आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक येथे पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेविषयी उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आला. पण पैठण तालुक्याची उपसा सिचंन योजना आणि गंगापुर तालुक्यातील ३७५ गावांकरीता वॉटर ग्रीड योजनेसाठी १०७५ कोटी महाविकास आघाडी सरकारनेच मंजूर केली होती. महाराष्ट्रात १३००हून अधिक आणि मराठवाड्यात ७८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. मंत्रीमंडळ बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केले. मात्र, मराठवाड्यातील जनतेसाठी विशेष पॅकेज न देता सन २०१६मध्ये केलेल्या घोषणांचाच पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला. नांदुर मधमेश्वर कालव्यासाठी २३४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील २१६४ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. यातील मराठवाड्यासाठी केवळ ७४ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारी कादगपत्रे सांगतात. जालना येथे सीड पार्कची घोषणा करण्यात आली. या सीड पार्कसाठी एमआयडीसीची जागा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती.

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी १४ हजार कोटीची तरतूद निव्वळ थापमराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी १४ हजार कोटी रुपयांची घोषणा म्हणजे निव्वळ थाप आहे. या योजनेच्या सर्वेक्षण करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. अद्याप सर्वेक्षणच झाले नाही, तर १४ हजार कोटी रुपयांची तरतूद कोणत्या कामासाठी केली, असा सवाल त्यांनी केला.

शहराच्या नामांतराचे श्रेय बाळासाहेबांनाचऔरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नांमातर करण्याच्या निर्णय राज्यसरकारने घेतला,याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या शहाराचे पहिले नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला होता. यामुळे याचे श्रेय केवळ बाळासाहेब आणि महााविकास आघाडी सरकारलाच जाते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद