शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

'मुख्यमंत्र्यांकडून जुन्याच योजनांची घोषणा'; अंबादास दानवेंनी थेट २०१६ सालचे निर्णयच दाखवले

By बापू सोळुंके | Updated: September 16, 2023 17:52 IST

सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली; विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: सात वर्षानंतर आज येथे झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ५९ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली. सन २०१६ साली येथे झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. यातील रखडलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. शिवाय अर्थसंकल्पात मंजूर निधीशिवाय आजच्या बैठकीत मराठवाड्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी मिळणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने मंत्रीमंडळाने मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने, पुसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्च करून आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक येथे पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेविषयी उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आला. पण पैठण तालुक्याची उपसा सिचंन योजना आणि गंगापुर तालुक्यातील ३७५ गावांकरीता वॉटर ग्रीड योजनेसाठी १०७५ कोटी महाविकास आघाडी सरकारनेच मंजूर केली होती. महाराष्ट्रात १३००हून अधिक आणि मराठवाड्यात ७८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी एक शब्दही मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. मंत्रीमंडळ बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केले. मात्र, मराठवाड्यातील जनतेसाठी विशेष पॅकेज न देता सन २०१६मध्ये केलेल्या घोषणांचाच पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला. नांदुर मधमेश्वर कालव्यासाठी २३४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील २१६४ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. यातील मराठवाड्यासाठी केवळ ७४ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारी कादगपत्रे सांगतात. जालना येथे सीड पार्कची घोषणा करण्यात आली. या सीड पार्कसाठी एमआयडीसीची जागा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली होती.

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी १४ हजार कोटीची तरतूद निव्वळ थापमराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी १४ हजार कोटी रुपयांची घोषणा म्हणजे निव्वळ थाप आहे. या योजनेच्या सर्वेक्षण करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. अद्याप सर्वेक्षणच झाले नाही, तर १४ हजार कोटी रुपयांची तरतूद कोणत्या कामासाठी केली, असा सवाल त्यांनी केला.

शहराच्या नामांतराचे श्रेय बाळासाहेबांनाचऔरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नांमातर करण्याच्या निर्णय राज्यसरकारने घेतला,याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या शहाराचे पहिले नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला होता. यामुळे याचे श्रेय केवळ बाळासाहेब आणि महााविकास आघाडी सरकारलाच जाते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद