शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन आता ऑक्टोबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:42 IST

यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे.संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापन

औरंगाबाद : साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. त्यात स्थापनेनुसार बदल करून तो आता ऑक्टोबर महिन्यात घेण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, महामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे. त्यामुळे यापुढे फेब्रुवारीमध्ये होणारा वर्धापन दिन ऑक्टोबरमध्ये घ्यावा, असे ठरले. त्यानुसार यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. मराठी भाषा शिक्षण कायद्याबरोबरच मराठी भाषेच्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या मराठी शाळा सुरू ठेवण्याचा आणि नवीन शाळांना मान्यता देण्याच्या प्रश्नांविषयीही विचार करण्यात आला आणि हे प्रश्न महामंडळाने शासनासमोर मांडावेत, असा निर्णय बैठकीत झाला.

हैदराबादचे मराठी महाविद्यालय बंद करण्यात यावे, असे तेलंगणा सरकारने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला कळवले आहे. हा प्रश्न अल्पसंख्याकांच्या भाषेच्या मूलभूत हक्काचा असून, वकिलाच्या साहाय्याने हे प्रकरण न्यायालयात न्यावे आणि त्यासाठी निधी साहित्य महामंडळ उपलब्ध करून देईल, असा निर्णय झाला. महामंडळाचे वार्षिक अक्षरयात्राच्या संपादक मंडळाची नियुक्तीही यावेळी करण्यात आली. डॉ. दादा गोरे हे संपादक म्हणून काम पाहतील, तर सल्लागार मंडळात सुनीता राजे पवार (पुणे), डॉ. गजानन नारे (अकोला), डॉ. उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई) आणि डॉ. रामचंद्र काळुंखे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. काळुंखे यांनी २०१९-२० चा अर्थसंकल्प मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ठाले पाटील यांच्यासह डॉ. गोरे, डॉ. विद्या देवधर, डॉ. काळुंखे, विलास मानेकर, डॉ. गजानन नारे आदींची उपस्थिती होती.

संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापनसाहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठित करण्यात आली. या समितीत उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे डॉ. प्रदीप दाते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे. संमेलनासाठी आलेल्या चार निमंत्रणांमधून उस्मानाबाद आणि नाशिक या दोन ठिकाणी ही समिती भेट देईल आणि अहवाल महामंडळाकडे सादर करील. त्यानुसार पुढील बैठकीत साहित्य संमेलनाच्या स्थळाविषयी विचार होईल, असेही या बैठकीत ठरले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद