शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन आता ऑक्टोबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:42 IST

यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे.संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापन

औरंगाबाद : साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. त्यात स्थापनेनुसार बदल करून तो आता ऑक्टोबर महिन्यात घेण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, महामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे. त्यामुळे यापुढे फेब्रुवारीमध्ये होणारा वर्धापन दिन ऑक्टोबरमध्ये घ्यावा, असे ठरले. त्यानुसार यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. मराठी भाषा शिक्षण कायद्याबरोबरच मराठी भाषेच्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या मराठी शाळा सुरू ठेवण्याचा आणि नवीन शाळांना मान्यता देण्याच्या प्रश्नांविषयीही विचार करण्यात आला आणि हे प्रश्न महामंडळाने शासनासमोर मांडावेत, असा निर्णय बैठकीत झाला.

हैदराबादचे मराठी महाविद्यालय बंद करण्यात यावे, असे तेलंगणा सरकारने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला कळवले आहे. हा प्रश्न अल्पसंख्याकांच्या भाषेच्या मूलभूत हक्काचा असून, वकिलाच्या साहाय्याने हे प्रकरण न्यायालयात न्यावे आणि त्यासाठी निधी साहित्य महामंडळ उपलब्ध करून देईल, असा निर्णय झाला. महामंडळाचे वार्षिक अक्षरयात्राच्या संपादक मंडळाची नियुक्तीही यावेळी करण्यात आली. डॉ. दादा गोरे हे संपादक म्हणून काम पाहतील, तर सल्लागार मंडळात सुनीता राजे पवार (पुणे), डॉ. गजानन नारे (अकोला), डॉ. उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई) आणि डॉ. रामचंद्र काळुंखे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. काळुंखे यांनी २०१९-२० चा अर्थसंकल्प मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ठाले पाटील यांच्यासह डॉ. गोरे, डॉ. विद्या देवधर, डॉ. काळुंखे, विलास मानेकर, डॉ. गजानन नारे आदींची उपस्थिती होती.

संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापनसाहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठित करण्यात आली. या समितीत उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे डॉ. प्रदीप दाते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे. संमेलनासाठी आलेल्या चार निमंत्रणांमधून उस्मानाबाद आणि नाशिक या दोन ठिकाणी ही समिती भेट देईल आणि अहवाल महामंडळाकडे सादर करील. त्यानुसार पुढील बैठकीत साहित्य संमेलनाच्या स्थळाविषयी विचार होईल, असेही या बैठकीत ठरले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद