शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

ऐन लग्नसराईत बससेवेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: May 12, 2014 00:01 IST

गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्‍या बसफेर्‍यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे.

 गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्‍या बसफेर्‍यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे. गत महिन्यापासून चाललेल्या परिवहन विभागाच्या कारभारामुळे बहुतांश बस फेर्‍या नियोजित वेळेत येत नाहीत. काही बसेस शेजारील गावातून परस्पर परतत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडून गैरसोय होत आहे. हिंगोली जिल्ह्याची राजकीय राजधानी संबोधल्या जाणार्‍या तसेच शेजारील ५२ खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गोरेगावात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच बाजारपेठ व व्यावहारिकदृष्ट्या सभोवतालच्या गावासाठी महत्वाच्या असलेल्या या गावात परिवहन विभागाच्या दुर्लक्षाने बससेवेचा बोजवारा उडाल्याने सामान्य प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. गोरेगाव येथे हिंगोली- वाशिम- रिसोड- जिंतूर ही जिंतूर आगाराची बसफेरी नियमित नियोजित वेळेत सुरू आहे; परंतु गत महिन्याभरापासून परिवहन कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बस सेवेचे नियोजन बिघडलेले आहे. बहुतांश बसफेर्‍यांना नियोजित वेळेचे तारतम्य राहिलेले नसून बसेस अवेळी धावत आहेत. रिसोड आगाराच्या काही बसफेर्‍या शेजारील केंद्रा बु. या गावातूनच परस्पर परत जात आहेत. तर रात्री मुक्कामी येणार्‍या दोन्ही बसफेर्‍या गोरेगावात मुक्कामी न येता केंद्रा बु. व मन्नास पिंपरी येथे मुक्कामी थांबून परस्पर परतत आहेत. हिंगोली आगाराच्या बहुतांश बसफेर्‍या नियोजित वेळेत धावत असून आगाराकडून सदर मार्गावर पाठविण्यात येणार्‍या बसेस जुन्या असल्याने त्यामध्ये सतत बिघाड होतो. परिणामी बसफेर्‍यांच्या वेळेत अनियमितता येत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून नाविलाजाने प्रवाशांना खाजगी वाहनांमधून धोक्याचा प्रवास करून पायपीट करावी लागत आहे. परिवहन मंडळाच्या या कारभारामुळे बससेवा कोलमडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खाजगी वाहन धारकांना लग्नसराई हंगामाची सुगी साधण्यासाठी संधी मिळत आहे. मात्र प्रवाशांची होत असलेली पायपीट व गैरसोय पाहता राज्य परिवहन विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर) जिंतूरचीही बस थांबेना जिंतूर आगाराची गोरेगाव मार्गे सुरू असलेली जिंतूर, वाशिम बस फेरी कधी-कधी गोरेगाव येथे न थांबता कन्हेरगाव- सेनगाव रस्त्यावरून थेट परस्पर निघून जात आहेत. ५२ खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गोरेगावातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.