शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

औरंगाबाद जिल्ह्यातून चारा वाहतुकीला बंदी; दुष्काळात जनावरांना जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:27 IST

प्रशासनाने चाऱ्याच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. 

ठळक मुद्दे१० लाख ६७ हजार जनावरांना जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हानजिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या 

औरंगाबाद : जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गंभीर दुष्काळ असल्याचे शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर केले आहे. त्यामुळे जून २०१९ अखेरपर्यंत नऊ तालुक्यांतील पशुधन जगविण्यासाठी चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत प्रशासनाने चाऱ्याच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. 

जिल्ह्यात सरासरीच्या ५३ टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे सर्व तालुक्यांत गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई भासण्याची शक्यता आहे. येथील उत्पादित चारा पशुधनाला पुरावा या दृष्टीने जिल्ह्यातून परजिल्ह्यात अथवा परराज्यात चारा वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे जनावरांना चारा न मिळाल्यास चाऱ्याची पळवा-पळवी होऊ शकते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ३० जून २०१९ पर्यंत चारा वाहतूक बंदी करण्यात आली आहे. 

२३६ दिवस पुरेल इतकाच चारा जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ११८ लहान जनावरे आहेत. ५ लाख ८ हजार ३२ मोठी जनावरे आहेत. शेळी व मेंढी ३ लाख ९१ हजार २३२ आहेत. १० लाख ६७ हजार ४१२ इतके सर्व पशुधन आहे. ३ हजार ७८७ मेट्रिक टन इतका चारा या पशुधनाला रोज लागतो. सध्या ८ लाख ९४ हजार ६३६ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. २३६ दिवस हा चारा जिल्ह्यातील पशुधनाला पुरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. १० लाख २२ हजार ६१६ मेट्रिक टन चारा जून २०१९ पर्यंत लागणार आहे. १ लाख २७ हजार ९८२ मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा जाणवेल. चारा उपलब्ध करण्याचे प्रशासनासमोर आव्हान असेल.