शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

संतप्त महिलांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:28 IST

वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीतील पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन सरपंच व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पाणी पुरवठा करण्यात आला.

गावातील अजवानगर, दत्त कॉलनी, शिवाजीनगर आदी भागात मार्चपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीकडून आठवडाभराच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात होता.

मात्र, आजघडीला या नवीन वसाहतीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहेत. गावाला पाणी पुरवठा करणारी एक सार्वजनिक विहीर कोरडी पडली असून, रामराईरोडवरील विहिरीच्या पाणी पातळीतही घट झाली आहे.

गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने गरवारे उद्योग समुहाकडून गावात दररोज जवळपास ५० हजार लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अजवानगरातील महिला व नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंचासह पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अनिता धिर, अमिना खान, योगिता चव्हाण, लंका मालोदे, करिमा बेगम, छाया देशमुख आदींनी सरपंच पपीन माने व पदाधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करुन सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. या प्रसंगी सरपंच माने यांनी एमआयडीसीने पाणी पुरवठ्यात कपात केल्याने तसेच विहिरीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर या परिसरात तात्काळ पाणी पुरवठा सुरु करुन संबंधित दोन कर्मचाºयांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्याचे सरपंच माने यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात