शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

संतप्त महिलांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:28 IST

वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीतील पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन सरपंच व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पाणी पुरवठा करण्यात आला.

गावातील अजवानगर, दत्त कॉलनी, शिवाजीनगर आदी भागात मार्चपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीकडून आठवडाभराच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात होता.

मात्र, आजघडीला या नवीन वसाहतीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहेत. गावाला पाणी पुरवठा करणारी एक सार्वजनिक विहीर कोरडी पडली असून, रामराईरोडवरील विहिरीच्या पाणी पातळीतही घट झाली आहे.

गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने गरवारे उद्योग समुहाकडून गावात दररोज जवळपास ५० हजार लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अजवानगरातील महिला व नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंचासह पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अनिता धिर, अमिना खान, योगिता चव्हाण, लंका मालोदे, करिमा बेगम, छाया देशमुख आदींनी सरपंच पपीन माने व पदाधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करुन सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. या प्रसंगी सरपंच माने यांनी एमआयडीसीने पाणी पुरवठ्यात कपात केल्याने तसेच विहिरीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर या परिसरात तात्काळ पाणी पुरवठा सुरु करुन संबंधित दोन कर्मचाºयांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्याचे सरपंच माने यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात