शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

संतप्त महिलांची ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:28 IST

वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीतील पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठुन सरपंच व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पाणी पुरवठा करण्यात आला.

गावातील अजवानगर, दत्त कॉलनी, शिवाजीनगर आदी भागात मार्चपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीकडून आठवडाभराच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात होता.

मात्र, आजघडीला या नवीन वसाहतीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहेत. गावाला पाणी पुरवठा करणारी एक सार्वजनिक विहीर कोरडी पडली असून, रामराईरोडवरील विहिरीच्या पाणी पातळीतही घट झाली आहे.

गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने गरवारे उद्योग समुहाकडून गावात दररोज जवळपास ५० हजार लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

अजवानगरातील महिला व नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंचासह पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अनिता धिर, अमिना खान, योगिता चव्हाण, लंका मालोदे, करिमा बेगम, छाया देशमुख आदींनी सरपंच पपीन माने व पदाधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती करुन सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. या प्रसंगी सरपंच माने यांनी एमआयडीसीने पाणी पुरवठ्यात कपात केल्याने तसेच विहिरीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर या परिसरात तात्काळ पाणी पुरवठा सुरु करुन संबंधित दोन कर्मचाºयांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्याचे सरपंच माने यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात