शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

अंगणवाडी सेविका नॉट रिचेबल, ऑफलाइन अहवालाचा ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : अंगणवाडी सेविका सध्या नॉट रिचेबल आहेत. कारण आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्याकडील मोबाइल परत केले आहेत. ...

औरंगाबाद : अंगणवाडी सेविका सध्या नॉट रिचेबल आहेत. कारण आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्याकडील मोबाइल परत केले आहेत. हे आंदोलन राज्यभर चालू असून, मोबाइलच्या संदर्भात प्रचंड तक्रारी वाढलेल्या आहेत. यातून त्यांच्या कामाचा व्याप वाढला आहे.

.............. १) जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या - ३ हजार ४५५ - अंगणवाडी सेविका - ३ हजार २५०

- किती जणींनी केला मोबाइल परत - दहा टक्के अंगणवाडी सेविकांनी

२) ...म्हणून केला मोबाइल परत....

केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे ते इंग्रजीत आहे. त्यामुळे इंग्रजीत काम करणे शक्य होत नाही. हे ॲप मराठीत देण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे. मोबाइलची क्वाॅलिटी चांगली नाही. ते कमी क्वाॅलिटीचे आहेत व वारंवार खराब होतात. त्याचा दुरुस्तीचा खर्चच चार ते पाच हजार रुपये इतका जातो. कधी कधी सात हजार रुपये येतो. ग्रामीण भागातील महिलांना दुरुस्तीसाठी औरंगाबादला यावे लागते. मोबाइल चांगल्या कंपनीचे द्यावेत आणि दुरुस्तीचा खर्च सरकारने करावा, म्हणूनही खराब मोबाइल परत करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू आहे.

३) कामाचा व्याप... १७ रजिस्टर भरावे लागतात. वजन-उंची, किती प्रमाणात बालक कुपोषित आहेत, कुपोषणाचे प्रमाण किती आहे, त्यांची प्रकृती कशी आहे, गर्भवती महिला किती आहेत, आरोग्य शिबिरे घेतली का, याबद्दल माहिती भरावी लागते. तीन वर्षांची किती मुले आहेत, तीन ते सहा वर्षांपर्यंतची किती मुले आहेत, गर्भवती महिला किती आहेत, अशी माहिती भरावी लागते.

४) असून अडचण नसून खोळंबा...

२७ ऑगस्टपासून आमचे आंदोलन सुरू आहे. जुजबी मानधनात आम्ही काम करतो. त्यात मोबाइल दुरुस्तीचा खर्चही आम्हालाच करावा लागतो. मोबाइल अत्यंत खराब क्वाॅलिटीचे आहेत. ते वारंवार हँग होतात. शिवाय ॲप इंग्रजीत आहे, ते मराठीत व्हायला पाहिजे. मी पैठण तालुक्याची युनियनची अध्यक्ष आहे. आमच्या तालुक्यातून जवळपास १५० ते २०० मोबाइल आम्ही परत केले आहेत.

- मीरा अडसरे, पैठण

............

फोर जीबीचा मोबाइल हवा...

सध्या आमच्याकडचे मोबाइल टू जीबीचे आहेत. ते फोर जीबीचे हवेत. गंगापूर तालुक्यातून आम्ही १२५ मोबाइल परत केले आहेत.

.........

दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांचं पत्र आलंय...

दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांचं पत्र आलंय. नादुरुस्त मोबाइल दुरुस्तीला टाकायला सांगण्यात आलं आहे. मोबाइल परत करण्याचं आंदोलन प्रतीकात्मक आहे. ७ ते ८ अंगणवाडी सेविकांनी मोबाइल परत केले असावेत. टू जीबी मोबाइलवर काम होत नाही. ते वारंवार हँग होतात, पाण्यापावसामुळे खराब होतात. या तक्रारींवरून हे आंदोलन सुरू आहे. सध्या अंगणवाड्या तशाही सुरू नाहीत.

- प्रसाद मिरखेले, उपायुक्त, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद

(डमी स्टार ११७६) -