शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

...तर रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल करणार

By admin | Updated: November 18, 2015 00:36 IST

जालना : रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या रस्त्यावर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच नागरिकांनाही रूळ ओलांडून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जालना : रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या रस्त्यावर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच नागरिकांनाही रूळ ओलांडून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी भूमीगत रस्ता करण्याची मागणी होत आहे. मात्र राज्य शासनाने जर निधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येणार असून, त्यादृष्टीने रेल्वेने नियोजन केले असल्याची माहिती रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय प्रबंधक अविशकुमार सिन्हा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.जालना रेल्वे स्थानकातील विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी रेल्वेचे जनरल मॅनेजर गुप्ता हे ७ डिसेंबर रोजी जालना दौऱ्यावर येत आहे. त्याच्या दौऱ्यांच्या पूर्व तयारीसाठी सिन्हा मंगळवारी विशेष रेल्वेने जालन्यात आले होते. त्यांनी जालना रेल्वे स्थानकाची पाहणी केली. काही ठिकाणी अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जालना स्थानकात बनविण्यात आलेले विश्रामगृह हे प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. रेल्वे स्थानकांच्या पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, रेल्वेकडून प्रवाशांना अधिकाअधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच नागरिक रेल्वेच्या प्रवासाला प्रथम पसंती देत आहे. याठिकाणी आरक्षणाची होणारी अडचन दूर करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानका जवळील गेट बंद करून त्याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन जालन्याकडील नागरिकांना पूर्वेकडील उड्डाणपुला जवळून स्थानकात येण्यासाठी रस्ता नसल्याने या संदर्भात ते म्हणाले की रेल्वेच्या हद्दीत रेल्वेकडून रस्ता तयार करून देण्यात येईल. मात्र रेल्वेच्या हद्दीबाहेरील रस्त्याचा मुद्दा समोर येत असल्याचे सांगितले. मनमाड ते नांदेड दरम्यान रेल्वेला खटारे इंजिन देण्यात येत असल्याने ते वांरवार कुठेही बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आनुन दिले असता ते म्हणाले की, इंजिन खटारे वगैरे नसते. त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतरच ते रेल्वेला जोडले जाते. त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. मागील १७ दिवसांपासून एकही इंजिन नांदुरूस्त झाल्याच्या घटना घडल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे विभागीय बोर्डचे सल्लागार समितीचे जालन्याचे प्रतिनिधी अर्जुन गेही, प्रदीप मुथा, रेल्वे संघर्ष समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी गणेशलाल चौधरी, रेल्वे विभागीय तांत्रिक अधिकारी राजकुमार वानखेडे, कमलाकर राव यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.