शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वेताळवाडीचा दुर्लक्षित प्राचीन किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 19:03 IST

वारसा औरंगाबादचा : अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड, नांद्रा, तालतम, सुतोंडा, राहिलगड, मस्तगड असे दुर्लक्षित गड-किल्ले आहेत. त्यातीलच एक वेताळवाडीचा किल्ला होय. सोयगावपासून अवघ्या ३ कि.मी.अंतरावर वेताळवाडी गावाच्या पश्चिम, दक्षिण बाजूच्या कोपऱ्यावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.

- प्रशांत तेलवाडकरपर्यटनाची  राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्राचीन वास्तूचा ऐतिहासिक ठेवा बघण्यास मिळतो. त्यातीलच एक निसर्गरम्य सोयगाव तालुक्यातील वेताळवाडीचा किल्ला होय. अनेकांना या किल्ल्याचे नाव पहिल्यांदाच ऐकल्यासारखे वाटत असेल, पण हा किल्ला किती जुना आहे याविषयी वेगवेगळे तर्क लावण्यात येतात. कारण संदर्भासाठी कोणताही शिलालेख येथे नाही, पण भग्नावस्थेतील हा किल्ला पाहिल्यावर पूर्वीच्या त्याच्या सौंदर्याची कल्पना येऊ शकते. 

अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड, नांद्रा, तालतम, सुतोंडा, राहिलगड, मस्तगड असे दुर्लक्षित गड-किल्ले आहेत. त्यातीलच एक वेताळवाडीचा किल्ला होय. यास ‘वाडीचा किल्ला’ असेही म्हणतात. सोयगावपासून अवघ्या ३ कि.मी.च्या अंतरावर वेताळवाडी गावाच्या पश्चिम, दक्षिण बाजूच्या कोपऱ्यावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १९०० फूट (६२५ मीटर) आहे. हळद गावाकडे घाट रस्त्याने जाताना या किल्ल्याने डावीकडे अख्ख्या डोंगरालाच जणू कवेत घेतले आहे. अजिंठा रांगेतील सर्वात उंच ठिकाणावर असलेल्या या किल्ल्याला जंजाळा किल्ल्याच्या दिशेने तोंड असणारा उत्तरमुखी ‘जंजाळा दरवाजा’ हा मुख्य दरवाजा आहे.

याशिवाय पायथ्याशी असलेल्या वेताळवाडी गावाच्या दिशेने असणाऱ्या दरवाजाला ‘वाडी दरवाजा’ म्हटले जाते. सुमारे २० फूट उंचीचे हे दोन भक्कम दरवाजे या किल्ल्यात आहेत. तसेच उपदरवाजेदेखील आहेत. जिभीसारखे सहसा न पाहायला मिळणारे दुर्ग वैशिष्ट्य येथे आहे. याशिवाय कातळ कोरीव टाकी, तलाव, अंबरखाना, हमामखाना, बारादरीसारखी अनोखी वास्तू, बांधील खंदक, चोर दरवाजा, सर्वात उंच भागावर कमानींनी वेढलेला एक हवामहल आहे. या हवामहलमधून पायथ्याशी असलेले गाव दिसते. दूरवर पसरलेली तटबंदी, नागमोडी हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाचा नजरा अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात या किल्ल्यावर सोयगावचे निसर्गरम्य वातावरण मोहित करते.

या किल्ल्याच्या परिसरात हजारो सीताफळाची झाडी आहे. येथील सीताफळ देशभर प्रसिद्ध आहेत. पुरातत्व विभागाकडे या किल्ल्याच्या संवर्धन, देखभालीची जिमेदारी आहे. या किल्ल्याच्या पूर्व बाजूस म्हणजेच अजिंठा लेणीच्या पाठीमागील भागात रुद्रेश्वर लेणी आहे. ज्या लोकांना किल्ले पाहण्याची, पर्यटनाची आवड आहे, असे लोक आवर्जून या किल्ल्यास भेट देत असतात. मात्र, प्रचार-प्रसाराअभावी सोयगाव तालुक्यासारखाच हा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ निर्माण झाली आहे. अशा प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या जिल्ह्यातील हा वेताळवाडीचा किल्ला पाहण्यास नागरिकांनी अवश्य जावे. 

टॅग्स :FortगडAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन