शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांचे ‘नाथ’ बनून लुटीचा मांडताहेत ‘डाव’

By admin | Updated: May 18, 2015 00:20 IST

पंकज जैस्वाल , लातूर सर्वधर्मीय अनाथ नववधूवरांचा ११ जोडप्यांचा विवाह सोहळा जागतिक महिला दिनी आयोजित केला असल्याचे भासवून काही जणांनी लातूर जिल्ह्यातील अनेकांकडून निधी गोळा केला़

पंकज जैस्वाल , लातूरसर्वधर्मीय अनाथ नववधूवरांचा ११ जोडप्यांचा विवाह सोहळा जागतिक महिला दिनी आयोजित केला असल्याचे भासवून काही जणांनी लातूर जिल्ह्यातील अनेकांकडून निधी गोळा केला़ मान्यवरांच्या नावाखाली लुटलेली ही ‘माया’ लाखोंच्या घरात असल्याचे बोलले जात आहे़ गेल्या दोन महिन्यात अनाथांचा हा विवाह सोहळा झालाच नाही़ ज्यांनी सत्कार्य म्हणून देणगी दिली त्यांना पश्चाताप होत असून, अनाथांचे तथाकथित नाथ बनलेल्या या टवाळखोरांच्या झूंडीने लुटीचा डाव मांडल्याचे समोर आले आहे़ लातूरमधील एका फाऊंडेशनने ११ अनाथ मुला-मुलींचा विवाह ८ मार्च रोजी बाभळगाव-म्हाडा येथील एका शाळेमध्ये आयोजित केल्याची पत्रिका काढली़ मात्र तेथे विवाह सोहळा झालाच नसल्याचे शाळा प्रशासन सांगत आहे़ विवाहसोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून खा़सुनिल गायकवाड यांचे नाव दिलेले आहे़ परंतु, त्यांचे स्वीय सहाय्यक सारंग वाघमारे यांच्याकडे विचारणा केली असता अशा पद्धतीच्या कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना नव्हते़ ८ मार्च रोजी खासदार परगावी देवणी येथे होते, असे त्यांनी सांगितले़या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री आ़ दिलीपराव देशमुख यांचे नाव आहे़ प्रमुख पाहूणे म्हणून रक्तदाते पारससेठ चापसी, डॉ़विठ्ठल लहाने, डॉ़ सुधीर देशमुख, अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, माजी आ़ पाशा पटेल, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात यांची नावे आहेत़ त्यापैकी पारससेठ चापसी, अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात यांच्याशी संपर्क साधला असता अशा पद्धतीचा कुठलाही कार्यक्रम आपणास माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले़ अनाथांच्या विवाह सोहळ्यासाठी देणगी देणारे हात ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असे म्हणत आहेत़ आयोजन समितीमधील सदस्यांकडे विचारणा केली असता ते टोलवाटोलवीची भाषा करीत आहेत़ वास्तविक कार्यक्रमाचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे दिसत नाही़ अनाथ ११ जोडप्यांची नावे त्यांच्याकडे नाहीत़ मान्यवरांना कसलेही निमंत्रण पोहचले नसल्याचेही समोर आले आहे़ एकंदर या प्रकाराने आयोजकांचे गौडबंगाल उघडे पडले असून, मान्यवरांच्या नावांचा गैरवापर व अनाथांच्या नावाचा बाजार मांडून निधी उकळला जात असल्याचे समोर आले आहे़ या कार्यक्रमाची व फाऊंडेशनची धर्मादाय आयुक्तालयामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे़ ८ मार्च २०१५ रोजीचा अनाथांचा विवाह सोहळा अद्यापर्यंत झाला नसल्याचेही देणगीदारांनी सांगितले़ यामध्ये व्यापाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या रकमा दिल्या असल्याचे बोलले जात आहे़ त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे़