शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पावसासाठी हनुमानाला केला जलाअभिषेक

By admin | Updated: August 6, 2014 02:19 IST

एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर

एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर तालुक्यातील सुकणी येथील युवकांनी गंगाखेडपर्यंत ८५ किमीचे अंतर पदयात्राकाढून गोदावरी नदीच्या पाण्याने हनुमानाला अभिषेक केला़सविस्तर वृत्त असे की, पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही़ पूनर्वसू नक्षत्राच्या सुरूवातीला या भागात दोन मोठे सडाके (पाऊस) झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने चाढ्यावर मुठ धरली़ नंतरच्या काळात पाऊस झाला नसल्याने कोवळी पिके मान टाकून देऊ लागली आहेत़ जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसाऊ लागला आहे़ ही परिस्थिती विदारक असल्याने उदगीर तालुक्यातील सुकणी गावातील २०-२५ युवक एकत्र येऊन वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी नदीच्या पाण्याने अभिषेक करण्याची संकल्पना मांडली़ शुक्रवारी संध्याकाळी गंगाखेड येथे ही मंडळी पोहचली़ रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी तेथून नदीचे जल घेऊन ही मंडळी ८५ कि़मी़अंतर चालत जाण्याचा निर्णय घेतला़ खांद्यावर गंगाजल, हरिनामाचा गजर अन् टाळ मृदंगाच्यासाथीने ही मंडळी मजल दर मजल करीत सुकणी गावात शनिवारी सायंकाळी ६ वाजता दाखल झाल्याने गावच्या शिवारात या मंडळीचं मोठ्या मानाने ग्रामस्थांने स्वागत करून गावात वाजत गाजत आणले़ संध्याकाळी पूजा, होम हवन करून विधीव हनुमानाला जलाने अभिषेक करून पाऊस पडावा म्हणून साकडे घातले़ शेवटी परूचा (गावजेवनाचा) कार्यक्रम घेण्यात आला़ श्रावणातील पहिल्या सोमवारपासून गावातील सुर्यकांत सुकणे हे विणा घेऊन मंदिरात उभे आहेत़ जो पर्यंत पाऊस पडत नाही तो पर्यंत हा विणा घेऊन व एकवेळ जेऊन उपवास करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे़ हे विशेष़़़