शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पावसासाठी हनुमानाला केला जलाअभिषेक

By admin | Updated: August 6, 2014 02:19 IST

एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर

एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर तालुक्यातील सुकणी येथील युवकांनी गंगाखेडपर्यंत ८५ किमीचे अंतर पदयात्राकाढून गोदावरी नदीच्या पाण्याने हनुमानाला अभिषेक केला़सविस्तर वृत्त असे की, पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही़ पूनर्वसू नक्षत्राच्या सुरूवातीला या भागात दोन मोठे सडाके (पाऊस) झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने चाढ्यावर मुठ धरली़ नंतरच्या काळात पाऊस झाला नसल्याने कोवळी पिके मान टाकून देऊ लागली आहेत़ जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसाऊ लागला आहे़ ही परिस्थिती विदारक असल्याने उदगीर तालुक्यातील सुकणी गावातील २०-२५ युवक एकत्र येऊन वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी नदीच्या पाण्याने अभिषेक करण्याची संकल्पना मांडली़ शुक्रवारी संध्याकाळी गंगाखेड येथे ही मंडळी पोहचली़ रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी तेथून नदीचे जल घेऊन ही मंडळी ८५ कि़मी़अंतर चालत जाण्याचा निर्णय घेतला़ खांद्यावर गंगाजल, हरिनामाचा गजर अन् टाळ मृदंगाच्यासाथीने ही मंडळी मजल दर मजल करीत सुकणी गावात शनिवारी सायंकाळी ६ वाजता दाखल झाल्याने गावच्या शिवारात या मंडळीचं मोठ्या मानाने ग्रामस्थांने स्वागत करून गावात वाजत गाजत आणले़ संध्याकाळी पूजा, होम हवन करून विधीव हनुमानाला जलाने अभिषेक करून पाऊस पडावा म्हणून साकडे घातले़ शेवटी परूचा (गावजेवनाचा) कार्यक्रम घेण्यात आला़ श्रावणातील पहिल्या सोमवारपासून गावातील सुर्यकांत सुकणे हे विणा घेऊन मंदिरात उभे आहेत़ जो पर्यंत पाऊस पडत नाही तो पर्यंत हा विणा घेऊन व एकवेळ जेऊन उपवास करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे़ हे विशेष़़़