शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

अन् यांना म्हणे सर्वांच्या आरोग्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:08 IST

पैठण शहरात विविध ठिकाणी रूग्णालयातील व छोट्या मोठ्या दवाखान्यातील जैविक कचरा टाकण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

संजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठण शहरात विविध ठिकाणी रूग्णालयातील व छोट्या मोठ्या दवाखान्यातील जैविक कचरा टाकण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जैव वैद्यकीय कचºयाचे संकलन करणा-या वाटरग्रेस प्रॉडक्ट कंपनीने तर पैठण शहरातील अनेक डॉक्टरांनी त्यांच्याकडे नोंदणीच केली नसल्याची धक्कादायक बाब उघड केली असून शहरात असे २४ डॉक्टर असल्याचे सांगितले.या डॉक्टरांच्या दवाखान्यातील कचरा शहर परिसरातच टाकला जात आहे. विशेष म्हणजे याबाबत न.प. मुख्याधिकाºयांनी बोलावलेल्या बैठकीकडेही डॉक्टरांनी पाठ फिरवल्याने प्रशासन आता कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. शहरातील सर्व जैव वैद्यकीय कचºयाचे संकलन करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागत नसल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहरातील रुग्णालयांमधील वैद्यकीय कचरा उचलण्याची जबाबदारी औरंगाबाद मनपाच्या अंतर्गत येणाºया वाटरग्रेस प्रॉडक्ट बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प युनिटकडे आहे. या युनिटचे औरंगाबाद येथून दिवसाआड वाहन पैठण येथे येऊन विविध रूग्णालयातून वैद्यकीय कचºयाचे संकलन करते. या कचरा संकलनासाठी हॉस्पिटलमधील बेडनुसार दर आकारले जातात. पैठण शहरात २० मोठे रूग्णालये तर २५ क्लिनिक आहेत. शिवाय रक्ततपासणी प्रयोगशाळा व मेडिकलची संख्याही मोठी आहे.यामुळे शहरात दररोज मोठा वैद्यकीय कचरा निर्माण होतो. परंतु संकलनाची व्यवस्था असतानाही काही दवाखाने, रक्तपेढ्या व प्रयोगशाळांमधून नियमित कचरा संकलन होत नाही. निर्माण होणारा कचरा सामान्य कचºयातच टाकला जातो. वैद्यकीय कचºयामध्ये रोगजंतू असण्याचा धोका असतो. सामान्य कचºयातून या रोगजंतूंचा प्रसार होण्याची भीती असते. त्यामुळे या कचºयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. हा जैव कचरा अतिशय धोकादायक असल्याने फार काळजी घ्यावी लागते. परंतु शहरातील २४ डॉक्टरांना याचे गांभीर्य नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार जैव कचºयाची विल्हेवाट नियमानुसार होत नसेल तर कारवाई करण्याचे अधिकार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देण्यात आले आहेत. शहरात जैविक कचरा टाकून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाºया डॉक्टरांच्या विरोधात नगरपरिषद राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची हिंमत दाखवेल का हाही एक मोठा प्रश्नच आहे. तर दुसरीकडे वाटरग्रेस कंपनीकडे नोंदणी नसलेल्या डॉक्टरांनी कचºयाची विल्हेवाट कोठे व कशी लावली, याबाबत चौकशी होणेही गरजेचे आहे.न.प.च्या बैठकीकडे डॉक्टरांची पाठस्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता उपक्रमाबाबत जैविक कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी ८ डिसेंबर रोजी बोलविलेल्या बैठकीकडे शहरातील डॉक्टरांनी पाठ फिरवली. या बैठकीस डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मदन मानधने या एकमेव डॉक्टरांनी उपस्थिती लावली. या प्रकारामुळे स्वच्छतेविषयी डॉक्टरांची असलेली अनास्था समोर आली आहे.स्वच्छतेच्या उपक्रमाबाबत डॉक्टरांची बैठक बोलविण्यात आली होती. परंतु बैठकीला डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे जैविक कचºयाच्या विल्हेवाट लावण्याचा प्रश्नावर चर्चा झाली नाही. बैठकीला गैरहजर असल्याने खुलासा करण्याबाबत शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस देण्यात येईल व जिल्हाधिकाºयांना अहवाल पाठविण्यात येणार आहे.-सोमनाथ जाधव, मुख्याधिकारी, न.प. पैठणजैविक कचºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील डॉक्टरांनी बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जैविक कचरा आरोग्यास हानिकारक असल्याने या कचºयाची विल्हेवाट नियमानुसार होणे गरजेचे आहे. याबाबत डॉक्टरांची बैठक घेण्यात येईल.-डॉ. मदन मानधने, अध्यक्ष, पैठण तालुका डॉक्टर्स असोसिएशन