शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

हात झटकण्याची मानसिकता बदला : अमीर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:08 IST

अंबाजोगाई - हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता है, असा लाख मोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते अमीर खान यांनी बीड

अविनाश मुडेगावकर,अंबाजोगाई - हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता है, असा लाख मोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते अमीर खान यांनी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. पाणी फाउंंडेशनच्या वतीने अमीर खान जलजागृती करणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी त्याने अंबाजोगाईत अधिकाऱ्यांची एक बैठकच घेतली. यावेळी त्याने बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत आपण सर्वांनीच पाण्याच्या विषयावर काम केले तर हे सगळे चित्र बदलून जाईल, असा आशावादही व्यक्त केला.येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणकुमार परदेशी, सत्यमेव जयतेचे सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आ. प्रा. संगीता ठोंबरे, जिप. सीईओ नामदेव ननावरे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके उपस्थित होते. पाणी फौंडेशनच्या वतीने सध्या अंबाजोगाई तालुक्यात वीस ठिकाणी काम सुरू आहे.यावेळी अमीर खान याने, स्वत: गांभीर्याने काम करून श्रमदानातून काम करणाऱ्यांना सत्यमेव जयतेच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रोत्साहन व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. सत्यमेव जयतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय आणि कार्यक्रमाला अभिनेता अमीर खान उपस्थित राहणार असल्याने गुरूवारपासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आजवर आपण जे काम हाती घेतले ते पार पाडले, असे सांगत तो म्हणाला, बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा कलंक दूर करून समृद्धीसाठी लोकसहभाग अािण श्रमदानातून जलसिंचनाची कामे पार पाडण्याचे आपले स्वप्न आहे. यासाठी लोकसहभागाची आवश्यकता असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले. यावर्षी पाणी फाऊंडेशनने सुरू केलेले हे काम पुढील पाच वर्षात महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण करणारे ठरणार आहे. या पद्धतीने प्रयत्न करून आपल्याच गावचा विकास आपल्याच माध्यमातून झाला पाहिजे. मात्र हे काम करतांना राजकारण न करता प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला द्यायलाही तो विसरला नाही.यावर्षी पाऊस जोरदार होणार आहे. असे भाकित हवामान खाते व वेधशाळा यांच्यावतीने सुरू आहे. आता श्रमदानातून हे कामे करतांना टष्ट्वेंटी टष्ट्वेंटी सामन्याप्रमाणे आपल्याला लवकर कामे आटोपायची आहेत. पावसाळ्यापूर्वीच सिंचनाची कामे पूर्ण झाली तर पावसानंतर हा परिसर निश्चितच नंदनवन दिसल्याशिवाय राहणार नाही. यासाठी कमी दिवस राहिलेले असतांना नियोजन आराखडा तयार करून कामे करा, अडचण येईल तेथे सर्व प्रकारची मदत करण्यासाठी सत्यमेव जयतेची टीम व प्रशासकीय अधिकारी तुमच्या मदतीसाठी येतील असे सांगून बीड जिल्हा समृद्धीकडे नेण्यासाठी त्याने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले. संचालन तहसीलदार शरद झाडके यांनी तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मानले. चौकटीत नरेगा परिवर्तनाची नांदीशासनाच्या वतीने ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘नरेगा’ या योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जातात. या योजने अंतर्गत काम करतांना अनेक अडचणी येत असल्या तरी ही योजना ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी परिवर्तनाची नांदी ठरणारी आहे. हे काम इमानदारी, सच्चाई व मनातून केल्यास कसलीही अडचण येणार नाही. त्यासाठी नरेगाची भीती न बाळगता ही योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहचवा असे आवाहन आमीर खान याने केले. अमीरला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दीदुपारी एक वाजता अमीर खान याचे आगमन हेलिकॉप्टरने वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील हेलिपॅडवर झाले. तेथून तो पोलिस बंदोबस्तात वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पोहचला. मात्र या अंतरावर ठिकठिकाणी अमीरखानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तळपत्या उन्हातही मोठी गर्दी केली होती. चाहत्यांची ही मोठी गर्दी रोखणे पोलिस प्रशानासमोर मोठ्या जिकीरीचे काम बनले होते. पोलिसांनी वेळीच आपला खाक्या दाखवत चाहत्यांची गर्दी हुसकावून लावली. मात्र दोन तासांचा कार्यक्रम पूर्ण होऊन तो परत जाईपर्यंत त्याचे चाहते रखरखत्या उन्हात तळपत उभेच राहिले होते.