शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकाच ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : वाळूजजवळ १०८ रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने रुग्णाला सोडून परत जाताना ही घटना घडली. मात्र, रुग्णांचे ...

औरंगाबाद : वाळूजजवळ १०८ रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने रुग्णाला सोडून परत जाताना ही घटना घडली. मात्र, रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकांच ‘आजारी’ असल्याचे यानिमित्ताने समोर आले. नव्या रुग्णवाहिका मिळतच नसल्याने भंगार रुग्णवाहिकांवर शासकीय आरोग्य यंत्रणेची मदार आहे.

रुग्णसेवा देत असल्याने खासगी रुग्णवाहिकांच्या अवस्थेकडेही कानाडोळा केला जात आहे. रुग्णवाहिका हा रुग्णसेवेचा कणा मानला जातो. गंभीर आजारी, अत्यवस्थ, जखमी रुग्णाला कमीत कमी वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका निभावतात. परंतु आजघडीला शासकीय यंत्रणा भंगार रुग्णवाहिकांवर आरोग्याचा गाडा ओढत आहे. आरोग्य विभागातील १०२ क्रमांकाच्या तब्बल २३ रुग्णवाहिकांचे आयुष्य संपलेले आहे. परंतु तरीही या रुग्णवाहिकांतून रुग्णांची ने-आण केली जात आहे. शासनाकडे वारंवार नव्या रुग्णवाहिकांची मागणी केली जात आहे. परंतु नव्या रुग्णवाहिका मिळत नसल्याची परिस्थिती आहे. १०८ या रुग्णवाहिकेमुळे हजारो रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे. परंतु आगीच्या घटनेने रुग्णवाहिकांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याविषयी शंका उपस्थित होते आहे. १०८ रुग्णवाहिकांची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती, आरटीओ कार्यालयाकडून तपासणी केली जात असल्याचे समन्वयक ओमकुमार कोरडे म्हणाले.

एजन्सीची चौकशी केली जाणार

१०८ रुग्णवाहिका या बिव्हिजी या एजन्सीच्या माध्यमातून चालविण्यात येतात. आग लागलेल्या रुग्णवाहिकेची शेवटची सर्व्हिंग कधी केली होती, आगीचे कारण आदीसंदर्भात या एजन्सीची चौकशी केली जाईल. काही १०२ रुग्णवाहिका खराब आहे. त्यामुळे नव्या रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे.

- डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

--

रुग्णवाहिकांना सूचना देणार

सदर रुग्णवाहिकेची मेकॅनिकल बिघाडाच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयामार्फत तपासणी केली जाईल. परंतु आगीचे नेमके कारण अग्निशमन दल, फाॅरेन्सिक लॅबच सांगू शकतील. आगीचे कारण, प्राथमिक अंदाज मिळताच जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिकांना सूचना दिल्या जातील.

- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

--------

जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिका - ५३८

१०२ रुग्णवाहिका - ७०

१०८ रुग्णवाहिका - ३१

घाटीतील रुग्णवाहिका - ९