शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

आंबेडकरी विद्यार्थी चळवळ सक्षम व्हावी; नागसेन फेस्टिव्हलमध्ये अनेक वक्त्यांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:36 IST

राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी विद्यार्थी संघटना सक्षम व भक्कम करण्याची गरज आहे, असा सूर ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’मधील परिसंवादात निघाला. 

औरंगाबाद : अलीकडे काही वर्षांतील निवाडे बघितले, तर न्यायपालिकाही दलित-बहुजनांच्या हिताविरोधी असल्याचा प्रत्यय येत आहे. दलित-बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शिक्षण क्षेत्र कॉर्पोरेट क्षेत्राकडे सोपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याला वेळीच आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर विरोध करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी विद्यार्थी संघटना सक्षम व भक्कम करण्याची गरज आहे, असा सूर ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’मधील परिसंवादात निघाला. 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त नागसेनवनमधील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आजपासून सलग तीन दिवस ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’ या महोत्सवाला सुरुवात झाली. मिलिंद महाविद्यालयाच्या लुम्बिनी उद्यानामध्ये आयोजित या फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी माधवराव बोरडे, विजय तायडे, प्राचार्य टी.ए. कदम, प्राचार्य डॉ. किशोर साळवे, प्राचार्य बी.एस. गंगावणे, उपकुलसचिव प्रताप कलावंत, सचिन निकम, सिद्धार्थ मोकळे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी ‘फुले-आंबेडकरी विद्यार्थी चळवळीसमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडताना सचिन निकम म्हणाले की, विद्यार्थी चळवळ हीच पँथरचेदेखील उगमस्थान राहिलेली आहे; पण अलीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंबेडकरी पक्ष-संघटना बोलायला तयार नाहीत. समाजातील स्थिरस्थावर लोकांनी विद्यार्थी चळवळीला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे नेते प्रशांत दोन्था म्हणाले, संघटितरीत्या रोहित वेमुलाचा खून करण्यात आला. कारण तो आंबेडकरी विचाराची विद्यार्थी चळवळ चालवत होता. त्याच्या सोबत आम्ही होतो. आम्ही आंबेडकर वाचायला लागलो. आंबेडकर वाचल्यामुळे आमच्यात आत्मसन्मान जागृत झाला. आम्ही ब्राह्मणवादाला विरोध करीत राहिलो. आम्हाला या देशातील ब्राह्मण्यवाद, ब्राह्मण्यवादी विचाराचे सरकार आणि न्यायपालिका या सर्वांविरुद्ध लढा देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आंबेडकरी विद्यार्थी संघटना भक्कम करावी लागेल. पुण्याच्या भाग्येशा कुरणे यांनीही आपले मनोगत मांडले. सरकारच्या शिक्षण धोरणावर त्यांनी टीका केली.

‘दर्द हमारा, संघर्ष हमारा और नेताभी हमारा’परिसंवादामध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंबेडकरी विद्यार्थी संघटनेचे राहुल सोनपिंपळे यांनी अत्यंत परखड भूमिका मांडली. ते म्हणाले की, देशात दोन प्रकारची विद्यापीठे आहेत. एक सेंट्रल व दुसरे स्टेट विद्यापीठ. सेंट्रल विद्यापीठात एस.सी., एस.टी.चे विद्यार्थी कमी, तर स्टेट विद्यापीठांत यांची संख्या अधिक असते. एस.सी., एस.टी.च्या मुलांना शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित ठेवण्यासाठी सेंट्रल विद्यापीठाला अधिक निधी, तर स्टेटच्या विद्यापीठांना निधी अत्यंत कमी दिला जातो. डाव्या-उजव्या पक्ष- संघटना आपल्या विद्यार्थ्यांचा केवळ वापर करतात. त्यासाठी आपली लढाई आपणालाच लढावी लागेल. यापुढे ‘दर्द हमारा, संघर्ष हमारा और नेताभी हमारा’ ही भूमिका घ्यावी लागेल.

टॅग्स :Nagsen vanनागसेन वनMilind College Aurangabadमिलिंद महाविद्यालय औरंगाबादStudentविद्यार्थी