शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आंबेडकरी विद्यार्थी चळवळ सक्षम व्हावी; नागसेन फेस्टिव्हलमध्ये अनेक वक्त्यांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:36 IST

राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी विद्यार्थी संघटना सक्षम व भक्कम करण्याची गरज आहे, असा सूर ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’मधील परिसंवादात निघाला. 

औरंगाबाद : अलीकडे काही वर्षांतील निवाडे बघितले, तर न्यायपालिकाही दलित-बहुजनांच्या हिताविरोधी असल्याचा प्रत्यय येत आहे. दलित-बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शिक्षण क्षेत्र कॉर्पोरेट क्षेत्राकडे सोपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याला वेळीच आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर विरोध करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी विद्यार्थी संघटना सक्षम व भक्कम करण्याची गरज आहे, असा सूर ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’मधील परिसंवादात निघाला. 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त नागसेनवनमधील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आजपासून सलग तीन दिवस ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’ या महोत्सवाला सुरुवात झाली. मिलिंद महाविद्यालयाच्या लुम्बिनी उद्यानामध्ये आयोजित या फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी माधवराव बोरडे, विजय तायडे, प्राचार्य टी.ए. कदम, प्राचार्य डॉ. किशोर साळवे, प्राचार्य बी.एस. गंगावणे, उपकुलसचिव प्रताप कलावंत, सचिन निकम, सिद्धार्थ मोकळे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी ‘फुले-आंबेडकरी विद्यार्थी चळवळीसमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडताना सचिन निकम म्हणाले की, विद्यार्थी चळवळ हीच पँथरचेदेखील उगमस्थान राहिलेली आहे; पण अलीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंबेडकरी पक्ष-संघटना बोलायला तयार नाहीत. समाजातील स्थिरस्थावर लोकांनी विद्यार्थी चळवळीला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे नेते प्रशांत दोन्था म्हणाले, संघटितरीत्या रोहित वेमुलाचा खून करण्यात आला. कारण तो आंबेडकरी विचाराची विद्यार्थी चळवळ चालवत होता. त्याच्या सोबत आम्ही होतो. आम्ही आंबेडकर वाचायला लागलो. आंबेडकर वाचल्यामुळे आमच्यात आत्मसन्मान जागृत झाला. आम्ही ब्राह्मणवादाला विरोध करीत राहिलो. आम्हाला या देशातील ब्राह्मण्यवाद, ब्राह्मण्यवादी विचाराचे सरकार आणि न्यायपालिका या सर्वांविरुद्ध लढा देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आंबेडकरी विद्यार्थी संघटना भक्कम करावी लागेल. पुण्याच्या भाग्येशा कुरणे यांनीही आपले मनोगत मांडले. सरकारच्या शिक्षण धोरणावर त्यांनी टीका केली.

‘दर्द हमारा, संघर्ष हमारा और नेताभी हमारा’परिसंवादामध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंबेडकरी विद्यार्थी संघटनेचे राहुल सोनपिंपळे यांनी अत्यंत परखड भूमिका मांडली. ते म्हणाले की, देशात दोन प्रकारची विद्यापीठे आहेत. एक सेंट्रल व दुसरे स्टेट विद्यापीठ. सेंट्रल विद्यापीठात एस.सी., एस.टी.चे विद्यार्थी कमी, तर स्टेट विद्यापीठांत यांची संख्या अधिक असते. एस.सी., एस.टी.च्या मुलांना शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित ठेवण्यासाठी सेंट्रल विद्यापीठाला अधिक निधी, तर स्टेटच्या विद्यापीठांना निधी अत्यंत कमी दिला जातो. डाव्या-उजव्या पक्ष- संघटना आपल्या विद्यार्थ्यांचा केवळ वापर करतात. त्यासाठी आपली लढाई आपणालाच लढावी लागेल. यापुढे ‘दर्द हमारा, संघर्ष हमारा और नेताभी हमारा’ ही भूमिका घ्यावी लागेल.

टॅग्स :Nagsen vanनागसेन वनMilind College Aurangabadमिलिंद महाविद्यालय औरंगाबादStudentविद्यार्थी