शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळ भय्यासाहेबांनी गतिमान केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:17 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रमात ते ‘भय्यासाहेब आंबेडकर जीवन आणि कर्तृत्व’ या विषयावर बोलत होते. डांगळे म्हणाले की, धर्मांतरापूर्वी चाचपणीची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुलावर टाकली होती. भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चळवळ अधिक गतिमान केली आहे. भय्यासाहेबांचे आंबेडकर भवनातील कार्यदेखील अतिशय नेत्रदीपक आहे. त्यांच्यामुळेच मी स्वत: लेखक, कार्यकर्ता म्हणून पुढे आलो, अशी एक एक कडी अर्जुन डांगळे यांनी भाषणातून उलगडत भय्यासाहेबांनी केलेले समाजासाठीचे योगदान मांडले.प्रा. अविनाश डोळस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाष्यकार सुनील कदम, महेश भारतीय यांची उपस्थिती होती. सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत शिरसाठ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश सांगितला. रमाई विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पक्षातील चार जण एकत्र म्हणजे मूर्खपणा असून, खºयाअर्थाने एससी/एसटी/ओबीसी, मराठा, परिवर्तनवादी ब्राह्मण असा सामाजिक एकोपा निर्माण झाले पाहिजे, असे मत सुनील कदम यांनी मांडले. पाणीमंत्री असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्येच अनेक बाबींचे नियोजन मांडले. त्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रारूपही आहे. कामगार, महिला सक्षमीकरण, स्कील डेव्हल्पमेंटही त्याच वेळेसची मांडणी आहे, असे कदम म्हणाले.‘आंबेडकर भवन इतिहास आणि वर्तमान’ यावर महेश भारतीय म्हणाले, रोहित वेमुलाच्या आईने बौद्ध धम्म येथे स्वीकारल्याने आंबेडकरी चळवळीचे केंद्रच षड्यंत्र करून जातीयवाद्यांनी नष्ट करण्याचे काम रत्नाकर गायकवाड याच्या माध्यमातून केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शासनाच्या विविध यंत्रणाही त्यात असल्याचा आरोप भारतीय यांनी केला. आनंद चक्रनारायण यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी चंद्रसेन वंजारे, प्रा. रेखा मेश्राम, संघपाल भारसाखळे, बुद्धप्रिय कबीर व संयोजकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.