शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळ भय्यासाहेबांनी गतिमान केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:17 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रमात ते ‘भय्यासाहेब आंबेडकर जीवन आणि कर्तृत्व’ या विषयावर बोलत होते. डांगळे म्हणाले की, धर्मांतरापूर्वी चाचपणीची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुलावर टाकली होती. भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चळवळ अधिक गतिमान केली आहे. भय्यासाहेबांचे आंबेडकर भवनातील कार्यदेखील अतिशय नेत्रदीपक आहे. त्यांच्यामुळेच मी स्वत: लेखक, कार्यकर्ता म्हणून पुढे आलो, अशी एक एक कडी अर्जुन डांगळे यांनी भाषणातून उलगडत भय्यासाहेबांनी केलेले समाजासाठीचे योगदान मांडले.प्रा. अविनाश डोळस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाष्यकार सुनील कदम, महेश भारतीय यांची उपस्थिती होती. सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत शिरसाठ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश सांगितला. रमाई विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पक्षातील चार जण एकत्र म्हणजे मूर्खपणा असून, खºयाअर्थाने एससी/एसटी/ओबीसी, मराठा, परिवर्तनवादी ब्राह्मण असा सामाजिक एकोपा निर्माण झाले पाहिजे, असे मत सुनील कदम यांनी मांडले. पाणीमंत्री असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्येच अनेक बाबींचे नियोजन मांडले. त्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रारूपही आहे. कामगार, महिला सक्षमीकरण, स्कील डेव्हल्पमेंटही त्याच वेळेसची मांडणी आहे, असे कदम म्हणाले.‘आंबेडकर भवन इतिहास आणि वर्तमान’ यावर महेश भारतीय म्हणाले, रोहित वेमुलाच्या आईने बौद्ध धम्म येथे स्वीकारल्याने आंबेडकरी चळवळीचे केंद्रच षड्यंत्र करून जातीयवाद्यांनी नष्ट करण्याचे काम रत्नाकर गायकवाड याच्या माध्यमातून केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शासनाच्या विविध यंत्रणाही त्यात असल्याचा आरोप भारतीय यांनी केला. आनंद चक्रनारायण यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी चंद्रसेन वंजारे, प्रा. रेखा मेश्राम, संघपाल भारसाखळे, बुद्धप्रिय कबीर व संयोजकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.