शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

आंबेडकरी चळवळ भय्यासाहेबांनी गतिमान केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:17 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रमात ते ‘भय्यासाहेब आंबेडकर जीवन आणि कर्तृत्व’ या विषयावर बोलत होते. डांगळे म्हणाले की, धर्मांतरापूर्वी चाचपणीची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुलावर टाकली होती. भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चळवळ अधिक गतिमान केली आहे. भय्यासाहेबांचे आंबेडकर भवनातील कार्यदेखील अतिशय नेत्रदीपक आहे. त्यांच्यामुळेच मी स्वत: लेखक, कार्यकर्ता म्हणून पुढे आलो, अशी एक एक कडी अर्जुन डांगळे यांनी भाषणातून उलगडत भय्यासाहेबांनी केलेले समाजासाठीचे योगदान मांडले.प्रा. अविनाश डोळस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाष्यकार सुनील कदम, महेश भारतीय यांची उपस्थिती होती. सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत शिरसाठ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश सांगितला. रमाई विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पक्षातील चार जण एकत्र म्हणजे मूर्खपणा असून, खºयाअर्थाने एससी/एसटी/ओबीसी, मराठा, परिवर्तनवादी ब्राह्मण असा सामाजिक एकोपा निर्माण झाले पाहिजे, असे मत सुनील कदम यांनी मांडले. पाणीमंत्री असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्येच अनेक बाबींचे नियोजन मांडले. त्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रारूपही आहे. कामगार, महिला सक्षमीकरण, स्कील डेव्हल्पमेंटही त्याच वेळेसची मांडणी आहे, असे कदम म्हणाले.‘आंबेडकर भवन इतिहास आणि वर्तमान’ यावर महेश भारतीय म्हणाले, रोहित वेमुलाच्या आईने बौद्ध धम्म येथे स्वीकारल्याने आंबेडकरी चळवळीचे केंद्रच षड्यंत्र करून जातीयवाद्यांनी नष्ट करण्याचे काम रत्नाकर गायकवाड याच्या माध्यमातून केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शासनाच्या विविध यंत्रणाही त्यात असल्याचा आरोप भारतीय यांनी केला. आनंद चक्रनारायण यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी चंद्रसेन वंजारे, प्रा. रेखा मेश्राम, संघपाल भारसाखळे, बुद्धप्रिय कबीर व संयोजकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.