शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अंबाजोगाईला महिन्यातून दोन वेळेसच पाणी

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे.

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे. तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने आजही गावोगावच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. अंबाजोगाईकरांना महिनाभरातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होतो. गुरांना पाणी नाही. चारा नाही, दुबार पेरणीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. अशा स्थितीत अंबाजोगाई तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मोठा रोष व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. यामध्ये अंबाजोगाईलाही वगळण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यात पुरेसा पाऊस नाही. गावोगावी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ठिकाठिकाणच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. गुरांना पिण्याचे पाणी नाही. चारा नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची दुबार पेरणी झाली. सलग एक महिना पावसाने हुलकावणी दिल्याने आहे ही पिके संकटात सापडली आहेत. अशी भीषण अवस्था असतानाही टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्याचा समावेश झाला नाही. याचा मोठा रोष शेतकरी व्यक्त करीत आहेत.प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घ्यावा अंबाजोगाई तालुक्यात भीषण टंचाई असतांनाही शासनाने तालुक्यास टंचाईग्रस्त यादीतून वगळले ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून निर्णयाचा फेरविचार करावा, वास्तव स्थिती पाहून अंबाजोगाई तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त यादीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अंबाजोगाई तालुका टंचाईग्रस्त जाहिर करा या मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला. तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शासनाच्या या कृतीचा आपण निषेध व्यक्त करीत असल्याची प्रतिक्रिया मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणाअंबाजोगाई तालुक्यात सध्या पाण्याअभावी भीषण स्थिती असतांना टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीत केवळ अंबाजोगाईचाच समावेश झाला नाही. येथील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय व हलगर्जीपणाचा मोठा फटका तालुक्याला सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष सुनिल जगताप यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)