शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अंबाजोगाईला महिन्यातून दोन वेळेसच पाणी

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे.

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे. तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने आजही गावोगावच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. अंबाजोगाईकरांना महिनाभरातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होतो. गुरांना पाणी नाही. चारा नाही, दुबार पेरणीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. अशा स्थितीत अंबाजोगाई तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मोठा रोष व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. यामध्ये अंबाजोगाईलाही वगळण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यात पुरेसा पाऊस नाही. गावोगावी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ठिकाठिकाणच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. गुरांना पिण्याचे पाणी नाही. चारा नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची दुबार पेरणी झाली. सलग एक महिना पावसाने हुलकावणी दिल्याने आहे ही पिके संकटात सापडली आहेत. अशी भीषण अवस्था असतानाही टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्याचा समावेश झाला नाही. याचा मोठा रोष शेतकरी व्यक्त करीत आहेत.प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घ्यावा अंबाजोगाई तालुक्यात भीषण टंचाई असतांनाही शासनाने तालुक्यास टंचाईग्रस्त यादीतून वगळले ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून निर्णयाचा फेरविचार करावा, वास्तव स्थिती पाहून अंबाजोगाई तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त यादीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अंबाजोगाई तालुका टंचाईग्रस्त जाहिर करा या मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला. तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शासनाच्या या कृतीचा आपण निषेध व्यक्त करीत असल्याची प्रतिक्रिया मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणाअंबाजोगाई तालुक्यात सध्या पाण्याअभावी भीषण स्थिती असतांना टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीत केवळ अंबाजोगाईचाच समावेश झाला नाही. येथील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय व हलगर्जीपणाचा मोठा फटका तालुक्याला सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष सुनिल जगताप यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)