शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

अंबाजोगाईला महिन्यातून दोन वेळेसच पाणी

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे.

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे. तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने आजही गावोगावच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. अंबाजोगाईकरांना महिनाभरातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होतो. गुरांना पाणी नाही. चारा नाही, दुबार पेरणीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. अशा स्थितीत अंबाजोगाई तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मोठा रोष व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. यामध्ये अंबाजोगाईलाही वगळण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यात पुरेसा पाऊस नाही. गावोगावी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ठिकाठिकाणच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. गुरांना पिण्याचे पाणी नाही. चारा नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची दुबार पेरणी झाली. सलग एक महिना पावसाने हुलकावणी दिल्याने आहे ही पिके संकटात सापडली आहेत. अशी भीषण अवस्था असतानाही टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्याचा समावेश झाला नाही. याचा मोठा रोष शेतकरी व्यक्त करीत आहेत.प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घ्यावा अंबाजोगाई तालुक्यात भीषण टंचाई असतांनाही शासनाने तालुक्यास टंचाईग्रस्त यादीतून वगळले ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून निर्णयाचा फेरविचार करावा, वास्तव स्थिती पाहून अंबाजोगाई तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त यादीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अंबाजोगाई तालुका टंचाईग्रस्त जाहिर करा या मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला. तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शासनाच्या या कृतीचा आपण निषेध व्यक्त करीत असल्याची प्रतिक्रिया मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणाअंबाजोगाई तालुक्यात सध्या पाण्याअभावी भीषण स्थिती असतांना टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीत केवळ अंबाजोगाईचाच समावेश झाला नाही. येथील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय व हलगर्जीपणाचा मोठा फटका तालुक्याला सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष सुनिल जगताप यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)