शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

अंबडमध्ये वीजबिल मिळेना!

By admin | Updated: September 4, 2015 00:27 IST

अंबड : तालुक्यातील वीज ग्राहकांना मागील तीन महिन्यांपासून वीज बिल न मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. याविषयी महावितरणकडे

अंबड : तालुक्यातील वीज ग्राहकांना मागील तीन महिन्यांपासून वीज बिल न मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. याविषयी महावितरणकडे अनेकदा तक्रार करुनही वीज बिल मिळत नसल्याने ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.विशेष बाब म्हणजे वीज बिल वाटपाबरोबरच वीज मीटरची रिडींग घेण्याच्या प्रकारातही सावळा गोंधळ होत आहे. अनेकांना अंदाजे रिडींगच्या आधारे अव्वाच्यासव्वा वीजबिल देण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे. महावितरण कार्यालयात वारंवार तक्रार करुनही महावितरणने संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उशिरा वीज बिल मिळाल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक दंड सोसावा लागत आहे. अंबड शहर व परिसरात ४ हजार ४२८ घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज जोडण्या आहेत. मीटरची रिडींग घेण्याचे व बिल वाटप करण्याचे कंत्राट मागील एक वर्षापूर्वी जालना येथील मदर महिला बहुउद्देशीय बचत गट संस्था या खाजगी एजन्सीला देण्यात आले. एजन्सीने मीटर रिडींग घेण्यासाठी व बिल वाटपासाठी काही जणांची नियुक्तीही केली. मात्र यातील बहुतांश व्यक्ती जालना शहर व अन्य गावातील असल्याने त्यांना अंबड शहर व परिसराची माहिती नाही. घरोघरी जाऊन मीटरची रिडींग घेण्याऐवजी अंदाजे रिडींग नोंदवणे, अंदाजे नोंदविण्यात आलेल्या रिडींगच्या आधारे वीजबील देणे, दर महिन्याला बिल वाटप करणे आवश्यक असतानाही दोन-दोन महिन्यांचे वीजबील एकत्र देणे असे प्रकार या एजन्सीने सुरु केले. अंदाजे रिडींग असल्याने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बील देण्याचा पराक्रम या एजन्सीने वारंवार केला आहे. याविषयी महावितरण कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारदार नागरिक आलेले बिल कमी करण्यासाठी दररोज महावितरण कार्यालयात चकरा मारताना दिसतात. याप्रमाणे गणित मांडल्यास अंबड शहर व परिसरातील वीजग्राहकांना कोणतीही चूक नसताना लाखो रुपयांचा दंड केवळ एजन्सीच्या गलथानपणामुळे भरावा लागणार आहे. मागील तीन महिन्यांपासून वीजबील प्राप्त न झाल्याने ग्राहकांनी याविषयी महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारीही केल्या, मात्र अद्यापही या खाजगी कंत्राटदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. याविषयी महावितरणचे अंबड शहर कनिष्ठ अभियंता सतीश अधाने यांच्याशी संपर्क साधला असता वीजबील न मिळाल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी मान्य केले. संबंधित एजन्सीला वारंवार सूचना देण्यात आल्या. तसेच मागील महिन्यात याविषयी संबंधित एजन्सीला लेखी पत्रही देण्यात आले. तसेच एजन्सीने वीजबिल वाटप न केल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजबील वाटपाचा प्रयत्नही केला.सध्या या एजन्सीने गलथानपणाचा कळस गाठला आहे, मागील तीन महिन्यांपासून बहुतांश ग्राहकांना वीजबिलांचे वाटपच करण्यात आलेले नाही. वीजबिल भरण्यास उशिर झाल्यास त्यावर दंड आकारण्यात येतो व जसाजसा उशीर होईल त्यावर चक्रवाढ व्याज दराने वीजबिलाची रक्कम वाढत जाते.