शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ईदच्या खरेदीसाठी रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्या; खा. जलील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:37 IST

MP Imtiyaz Jalil's demands Allow shops to open in the last week of Ramadan नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी देण्याची मागणी. 

औरंगाबाद : मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असलेल्या रमजानच्या शेवटच्या आठवड्यात ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खा. खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची आज भेट घेऊन नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी ( दि. १४ ) रमजान ईद आहे. यावेळी मुस्लीम बांधवांना वेगवेगळी खरेदी करायची असते. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहेत. औरंगाबादसह इतर ठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांस ईदसाठीचे अत्यावश्यक सामान खरेदी करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. शिवाय काही छोटेमोठे व्यापारी वर्षभरात या महिन्यात मोठा व्यापार करतात. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. यामुळे ईदच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन या काळात नियम आणि अटी घालून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. 

ईदनिमित्त होते मोठी उलाढालया वर्षी रमजानचा महिना १२ एप्रिल (बुधवार) पासून सुरु झाला आहे. मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महिनाभरानंतर सर्व बांधव ईदची मोठ्या उत्साहात साजरी करतात. या काळात विविध खरेदी केली जाते. यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. अनेक छोटेमोठे व्यापारी तर या काळात वर्षभराची उलाढाल करतात. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे.   

व्यापारी महासंघाने मागितली चार दिवसांची परवानगीमान्सूनपूर्व काम करण्यासाठी चार दिवस सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच सकाळी ११ ऐवजी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसेच  लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी  व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद