शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ईदच्या खरेदीसाठी रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्या; खा. जलील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:37 IST

MP Imtiyaz Jalil's demands Allow shops to open in the last week of Ramadan नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी देण्याची मागणी. 

औरंगाबाद : मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असलेल्या रमजानच्या शेवटच्या आठवड्यात ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खा. खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची आज भेट घेऊन नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी ( दि. १४ ) रमजान ईद आहे. यावेळी मुस्लीम बांधवांना वेगवेगळी खरेदी करायची असते. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहेत. औरंगाबादसह इतर ठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांस ईदसाठीचे अत्यावश्यक सामान खरेदी करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. शिवाय काही छोटेमोठे व्यापारी वर्षभरात या महिन्यात मोठा व्यापार करतात. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. यामुळे ईदच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन या काळात नियम आणि अटी घालून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. 

ईदनिमित्त होते मोठी उलाढालया वर्षी रमजानचा महिना १२ एप्रिल (बुधवार) पासून सुरु झाला आहे. मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महिनाभरानंतर सर्व बांधव ईदची मोठ्या उत्साहात साजरी करतात. या काळात विविध खरेदी केली जाते. यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. अनेक छोटेमोठे व्यापारी तर या काळात वर्षभराची उलाढाल करतात. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे.   

व्यापारी महासंघाने मागितली चार दिवसांची परवानगीमान्सूनपूर्व काम करण्यासाठी चार दिवस सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच सकाळी ११ ऐवजी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसेच  लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी  व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद