शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सेटलमेंटसाठी परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:28 IST

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत स्वतंत्रपणे टाकण्यात येणाऱ्या ‘समांतर’ जलवाहिनीची नवी निविदा काढण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याचबरोबर समांतर जलवाहिनीचे काम सोडून दिलेल्या कंपनीने १३५ कोटी रुपयांची मागणी केली असून याबाबत ‘सेटलमेंट’ करण्याचीही परवानगी महापौरांनी मागितली आहे.

ठळक मुद्देमहापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : ‘समांतर’ची नवी निविदा काढण्यासाठी शासनमंजुरी हवी

१५ कोटींची मागणीउन्हाळ्यापूर्वी शहरात पाणीपुरवठा योजनेत काही महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यासाठी राज्य शासनाने आपतकालीन योजनेतून १५ कोटींचे अनुदान द्यावे, अशी स्वतंत्र मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत स्वतंत्रपणे टाकण्यात येणाऱ्या ‘समांतर’ जलवाहिनीची नवी निविदा काढण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याचबरोबर समांतर जलवाहिनीचे काम सोडून दिलेल्या कंपनीने १३५ कोटी रुपयांची मागणी केली असून याबाबत ‘सेटलमेंट’ करण्याचीही परवानगी महापौरांनी मागितली आहे.योजना पूर्ण करण्यासाठी ६६० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, मनपा प्रशासनही या आशयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.समांतर जलवाहिनीच्या कंपनीने महापालिकेला २१ जानेवारी रोजी पत्र पाठविले. या योजनेत कंपनीने मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचे पत्रात नमूद केले आहे. कंपनीतील अंतर्गत भागीदार बदलण्याची परवानगी महापालिका देऊ शकत नसेल, तर या प्रकल्पातून आम्ही बाहेर पडण्यास तयार आहोत. ७९ कोटींची बँक गॅरंटी आणि १३५ कोटी रुपये योजनेतून बाहेर पडण्याचा मोबदला द्यावा, अशी कंपनीची मागणी आहे.मुख्यमंत्री रविवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी महापौर घोडेले यांनी त्यांची भेट घेऊन समांतरप्रकरणी निवेदन सादर केले. कंपनीने परत काम सुरू करावे यादृष्टीने मनपाने सर्व प्रयत्न केले. कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. कंपनीच्या जाचक अटी मान्य करणे मनपाला कदापि शक्य नाही. त्यामुळे कंपनीला आर्थिक मोबदला देऊन नव्याने निविदा काढण्यास परवानगी द्यावी. मनपाच्या तिजोरीत समांतरचे अनुदान पडून आहे. ही रक्कम ३६० कोटी असून, कंपनीला यातून १३५ कोटी रुपये दिल्यानंतरही २२५ कोटी रुपये शिल्लक राहतात. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी किमान ५६० कोटींचा खर्च येईल. शहरातील विविध कामे, जलकुंभ बांधण्यासाठी साधारणपणे १०० कोटी रुपये लागतील. ६६० कोटींमध्ये शहराची तहान भागेल, असे महापौरांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. राज्य शासनाला या योजनेत ४६५ कोटींचे अनुदान द्यावे लागेल, असा प्राथमिक अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मनपा आयुक्तही लवकरच यासंदर्भात त्यांच्या अभिप्रायासह मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस