शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

६९ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप

By admin | Updated: June 22, 2014 00:25 IST

हिंगोली : जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने दरवर्षी पीककर्ज वाटप करण्यात येते. २०१४-१५ या वर्षासाठी खरीप हंगामाकरीता जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेला सप्टेंबरपर्यंत ५३२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मे पासून आतापर्यंत जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या वतीने १६ हजार ४४४ हेक्टर जमिनीवरील १५ हजार १२६ शेतकऱ्यांच्या पिकांसाठी २२ कोटी ३ लाख ८० हजार रुपयांचे तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेच्या वतीने ३ हजार ३०५ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ३ हजार २४० शेतकऱ्यांना १९ कोटी २३ लाख ४२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. पीककर्ज वाटपाची ही सरासरी १२.९६ ही टक्केवारी असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत खरीप हंगामासाठीचे कर्ज वाटप उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची काही दिवसापूर्वी बैठकही घेतली होती. रब्बीसाठी १३३ कोटींचे उद्दिष्टरब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना एकूण १३३ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेला ३१ कोटी २० लाख रुपये, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेला ८९ कोटी ४० लाख रुपये आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १२ कोटी ४० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाचे कर्ज वाटप सुरू होते. (जिल्हा प्रतिनिधी)काही बँकांकडून कर्ज वाटपास टाळाटाळजिल्ह्यातील काही बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत; परंतु शासनाने सर्व बँकांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. एखादी बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यास याबाबतची तक्रार संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येते.