शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्व जलकुंभ कोरडे

By admin | Updated: September 17, 2014 01:16 IST

औरंगाबाद : सणासुदीत शहर १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करीत आहे. मंगळवारी शहरातील एकाही जलकुंभात पाणी नव्हते.

औरंगाबाद : सणासुदीत शहर १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करीत आहे. मंगळवारी शहरातील एकाही जलकुंभात पाणी नव्हते. सर्व जलकुंभ कोरडे पडल्यामुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने होणारा पाणीपुरवठा झाला नाही. सिडको, हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली.पालिकेने या प्रकरणी काहीही माहिती पुरविली नाही, तर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दिलेल्या माहितीत कुठलीही एकवाक्यता नव्हती. कंपनीच्या तांत्रिक आणि प्रशासकीय विभागात समन्वय नसल्याचे समोर आले असून, आज नागरिकांना महागडे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवावी लागली. १ दिवसाचे शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीही जलवाहिन्यांच्या गळत्यांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे शहरात जायकवाडीतून पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी, सर्व जलकुंभ कोरडेठाक पडले होते. कोटला कॉलनी, क्रांतीचौक, एन-५, एन-६ येथील पम्पिंग स्टेशनवर टँकरने पाणी भरण्याची सुविधा आहे. मात्र, जलकुंभात पाणीच आले नसल्यामुळे टँकर तेथेच उभे होते.कंपनीत समन्वय नसल्यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब झाली. जायकवाडी सबस्टेशन, जायकवाडी नवीन व जुन्या योजनेचे तसेच ढोरकीन, फारोळा येथे पंप दुरुस्ती, व्हॉल्व्हची दुरुस्ती व काही यांत्रिकी, विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी जलवाहिन्या कोरड्याच आहेत. रेल्वेस्टेशन ते ज्युबिली पार्कपर्यंत टाकण्यात आलेली ३८ कोटींची जलवाहिनी उद्या जोडण्यात येईल. तांत्रिक अभियंत्यांनी पाणीपुरवठा कधी होणार, या प्रकरणी काहीही स्पष्ट केले नाही. जायकवाडी ते शहरादरम्यान या जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या गळत्या आहेत. त्यांची दुरुस्ती अजून सुरू असल्याचे कंपनी सूत्रांनी सांगितले.नळांना पाणी आलेच नाही. शिवाय गुंठेवारी वसाहतींमधील टँकरही आज बंद होते. कं पनीचे अभियंता कोण आहेत, ते कुठे बसतात, याची कुठलीही माहिती नागरिकांना नसल्यामुळे ते जलकुंभावर हेलपाटे मारून वैतागून निघून गेले. नागरिकांना महागडे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवावी लागली. कंपनी आणि पालिका यांच्यात कोणतीही सुसूत्रता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. फारोळा येथे केलेली जोडणी निखळली. एकीकडे कंपनीचा जनसंपर्क विभाग कामे झाल्याचे जाहीर करतो आहे, तर दुसरीकडे तांत्रिक विभाग अजूनही डागडुजीचे काम करीत आहे.