शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बायपासवरचे तिन्ही पूल म्हणजे वाहतुकीचा गोंधळ अन् दलदल...

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:06 IST

पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : बायपासवर देवळाई, संग्रामनगर, एमआयटी अशा तीन उड्डाणपुलांची निर्मिती करून मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला; परंतु पावसाळ्यात तिन्ही पुलांजवळ दलदल झाली असून वाहतुकीचा गोंधळ उडाला आहे. 

सध्या पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी लोखंडी जाळ्या, रस्त्यावर दिवे लावण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या खाली खोदकाम, रस्ता सुरळीत करणे आणि पावसाच्या पाण्याला वाट काढून देण्याचे काम सुरू आहे; परंतु पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत. सध्या शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पुढे जोरदार पावसात मोठ्या अडचणी येऊ शकतात. सा. बां. विभागाने रस्त्यातील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी पालकवर्ग, तसेच नागरिकांतून होत आहे. अनेकांना पुलावरून जाता येत नाही. परिसरातील रहिवाशांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागते. पुलाखालील रस्ता मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी