शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

जिल्ह्यातील सर्व शाळा सर्वसाधारण क्षेत्रात !

By admin | Updated: May 9, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. त्यानुसार त्यानुसार अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित निश्चित करून शिक्षकांचे आॅनलाईन प्रस्ताव मागवून १५ मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. असे असतानाच जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम विभागाकडून सूचविण्यात आलेल्या ४९ शाळांची यादी वरिष्ठांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता गुरूजींची सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेतून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत बदली होणार आहे.मागील अनेक वर्षांपासून चालत आलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात यावेळी शासनाकडून बदल करण्यात आला आहे. या धोरणानुसार अवघड आणि सर्वसाधारण अशा दोन क्षेत्रात शाळांचा समावेश करून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र शिक्षकांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, शासनाने हे धोरण जाहीर केल्यापासून ते आजतागायत काही शिक्षक संघटनाकडून या धोरणाला विरोध होत होता. त्यामुळे ही बदली प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली होती. असे असतानाच दुसरीकडे जि.प. शिक्षण विभागाकडून शासन निर्देशानुसार प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत त्या-त्या तालुक्यातील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यात आल्या होत्या. बहुतांश तालुक्यांतून ज्या गावात एसटी बसेस जात नाही, अशा शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात केला होता. त्यामुळे एकेका केंद्रातील सर्वच शाळा अवघड क्षेत्रात आल्या होत्या. ही संख्या तीनशेच्या घरात गेली होती. दरम्यान, या शाळांची फेर तपासणी करण्यात आली असता, ही संख्या १०९ पर्यंत खाली आली. दरम्यान, जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला. त्यानुसार संबंधित यंत्रणेने रस्ते, दळणवळणाची साधने विचारात घेवून १०९ पैकी ४९ शाळा अवघड क्षेत्रात असल्याचे निश्चित करून तसा अहवाल सादर केला. दरम्यान, या ४९ शाळांची पुन्हा तपासणी केली असता, एकही शाळा अवघड क्षेत्रात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १५ मे नंतर होणाऱ्या बदल्या सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत होणार आहेत. ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.