शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

जिल्ह्यातील सर्व शाळा सर्वसाधारण क्षेत्रात !

By admin | Updated: May 9, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. त्यानुसार त्यानुसार अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित निश्चित करून शिक्षकांचे आॅनलाईन प्रस्ताव मागवून १५ मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. असे असतानाच जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम विभागाकडून सूचविण्यात आलेल्या ४९ शाळांची यादी वरिष्ठांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता गुरूजींची सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेतून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत बदली होणार आहे.मागील अनेक वर्षांपासून चालत आलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात यावेळी शासनाकडून बदल करण्यात आला आहे. या धोरणानुसार अवघड आणि सर्वसाधारण अशा दोन क्षेत्रात शाळांचा समावेश करून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र शिक्षकांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, शासनाने हे धोरण जाहीर केल्यापासून ते आजतागायत काही शिक्षक संघटनाकडून या धोरणाला विरोध होत होता. त्यामुळे ही बदली प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली होती. असे असतानाच दुसरीकडे जि.प. शिक्षण विभागाकडून शासन निर्देशानुसार प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत त्या-त्या तालुक्यातील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यात आल्या होत्या. बहुतांश तालुक्यांतून ज्या गावात एसटी बसेस जात नाही, अशा शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात केला होता. त्यामुळे एकेका केंद्रातील सर्वच शाळा अवघड क्षेत्रात आल्या होत्या. ही संख्या तीनशेच्या घरात गेली होती. दरम्यान, या शाळांची फेर तपासणी करण्यात आली असता, ही संख्या १०९ पर्यंत खाली आली. दरम्यान, जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला. त्यानुसार संबंधित यंत्रणेने रस्ते, दळणवळणाची साधने विचारात घेवून १०९ पैकी ४९ शाळा अवघड क्षेत्रात असल्याचे निश्चित करून तसा अहवाल सादर केला. दरम्यान, या ४९ शाळांची पुन्हा तपासणी केली असता, एकही शाळा अवघड क्षेत्रात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १५ मे नंतर होणाऱ्या बदल्या सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत होणार आहेत. ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.