शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व शाळा सर्वसाधारण क्षेत्रात !

By admin | Updated: May 9, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. त्यानुसार त्यानुसार अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित निश्चित करून शिक्षकांचे आॅनलाईन प्रस्ताव मागवून १५ मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. असे असतानाच जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम विभागाकडून सूचविण्यात आलेल्या ४९ शाळांची यादी वरिष्ठांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता गुरूजींची सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेतून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत बदली होणार आहे.मागील अनेक वर्षांपासून चालत आलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात यावेळी शासनाकडून बदल करण्यात आला आहे. या धोरणानुसार अवघड आणि सर्वसाधारण अशा दोन क्षेत्रात शाळांचा समावेश करून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र शिक्षकांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, शासनाने हे धोरण जाहीर केल्यापासून ते आजतागायत काही शिक्षक संघटनाकडून या धोरणाला विरोध होत होता. त्यामुळे ही बदली प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली होती. असे असतानाच दुसरीकडे जि.प. शिक्षण विभागाकडून शासन निर्देशानुसार प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत त्या-त्या तालुक्यातील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यात आल्या होत्या. बहुतांश तालुक्यांतून ज्या गावात एसटी बसेस जात नाही, अशा शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात केला होता. त्यामुळे एकेका केंद्रातील सर्वच शाळा अवघड क्षेत्रात आल्या होत्या. ही संख्या तीनशेच्या घरात गेली होती. दरम्यान, या शाळांची फेर तपासणी करण्यात आली असता, ही संख्या १०९ पर्यंत खाली आली. दरम्यान, जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला. त्यानुसार संबंधित यंत्रणेने रस्ते, दळणवळणाची साधने विचारात घेवून १०९ पैकी ४९ शाळा अवघड क्षेत्रात असल्याचे निश्चित करून तसा अहवाल सादर केला. दरम्यान, या ४९ शाळांची पुन्हा तपासणी केली असता, एकही शाळा अवघड क्षेत्रात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १५ मे नंतर होणाऱ्या बदल्या सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत होणार आहेत. ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.