शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

औरंगाबादेतील सर्व क्वारंटाईन सेंटर बंद; यापुढे अँटिजन टेस्टवर राहणार सर्वाधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 5:53 PM

क्वारंटाईन केंद्रे चालविण्यासाठी दररोज महापालिकेला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावे लागत होते. 

ठळक मुद्देमहापालिकेने उभारली होती ३२ केंद्रेरुग्ण नसल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी शहरात तब्बल ३२ ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारले होते. अत्याधुनिक अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आल्यानंतर हळूहळू क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांची संख्याही घटत होती. गुरुवारी रात्रीपासून शहरातील सर्व सेंटर्स बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. क्वारंटाईन करण्यासाठी रुग्णच नसल्याचे प्रशासक  आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाण्डेय यांनी नमूद केले की, रुग्ण नसल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या चिकलठाणा येथील कोविड केअर सेंटरमध्ये बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. याठिकाणी आॅक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सीएसआर फंडातून अत्याधुनिक सिटीस्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. एमजीएम, एमआयटी आणि किलेअर्क येथील सीसीसी अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. 

मार्च महिन्यात शहरात कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार शहरात २ हजार नागरिक राहू शकतील एवढ्या क्षमतेचे ३२ क्वारंटाईन सेंटर तयार केले. प्रत्येक सेंटरवर शंभर ते दीडशे संशयित रुग्णांना तीन ते चार दिवस थांबविण्यात येत होते. कोरोना टेस्टसाठी थांबविण्यात आलेल्या नागरिकांना दोन वेळा जेवण, चहा, नाश्ता आदी सोयीसुविधा महापालिकेला द्याव्या लागत होत्या. क्वारंटाईन केंद्रे चालविण्यासाठी दररोज महापालिकेला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावे लागत होते. 

औरंगाबादेत रुग्णसंख्या कमी; पण...राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबाद शहरात रुग्णसंख्या कमी आहे. आतापर्यंत २३ हजार रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्येचा विस्फोट कधीही होऊ शकतो. नागरिकांनी आपल्या जबाबदारीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, असेही पाण्डेय यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद