शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:02 IST

वैजापूर : नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर व दारणा धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे नांदुर मधमेश्वर धरणातून रविवारी सकाळी दहा ...

वैजापूर : नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर व दारणा धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे नांदुर मधमेश्वर धरणातून रविवारी सकाळी दहा वाजता गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोदावरीत सध्या १३ हजार ४२७ क्युसेकने विसर्ग सुरू असून, पाऊस व अतिवृष्टी झाल्यास नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणांच्या पाणीसाठ्यात होत असलेल्या वाढीमुळे पाण्याचा विसर्ग आवश्यकतेनुसार वाढवण्यात येणार आहे. वैजापूर तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर सतरा गावे वसलेली असून, पाणी पातळीत वाढ झाल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे, पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र, ओढा व नाल्यापासून दूर राहावे, पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, घाट रस्त्याने प्रवास करू नये, भुसख्ख्लन होण्याची शक्यता असल्याने डोंगर पायथ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे, आदी सूचना दिल्या आहेत.

140921\20210913_123214.jpg

फोटो