शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

हवाई दलाच्या विमानांनी चुकला काळजाचा ठोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:29 IST

हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहरावरून तीन ते चार घिरट्या मारल्या.

ठळक मुद्देसुखोई-३० : जोरदार आवाजामुळे घाबरून नागरिकांची घराबाहेर धाव

औरंगाबाद : हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहरावरून तीन ते चार घिरट्या मारल्या.शहरात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक आकाशातून मोठा आवाज येऊ लागल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. तेव्हा थोड्या थोड्या अंतराने एकापाठोपाठ दोन विमाने अतिशय वेगाने जात असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडले. या विमानांनी आकाशात दोन ते तीन घिरट्या मारल्या. विमानांचा आकाशात मोठा आवाज घुमत होता. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली. शहरातील विविध भागांत नागरिक घराबाहेर जमून चर्चा करीत होते. औरंगाबादेत हवाई दलाचे तळ नाही, मग अचानक लढाऊ विमान शहराच्या हद्दीत कसे काय उड्डाण करीत आहेत, काय झाले असावे, अशी चर्चा नागरिकांत सुरू झाली. अनेक जण उत्सुकतेपोटी एकमेकांना फोन करून विचारणा करीत होते. ही दोन्ही विमाने पुण्यावरून आली होती. ही सुखोई-३० विमान असून, त्यांनी रात्री ८ च्या सुमारास पुण्याकडे उड्डाण केले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.घरांना कंपगारखेडा, जवाहर कॉलनी आदींसह शहरावरून विमानाचे उड्डाण होत असताना आवाजामुळे घरांना कंप बसल्याचे जाणवले. त्यामुळे तात्काळ घराबाहेर पडलो, असे अनेक नागरिकांनी सांगितले.नियमित सरावहवाई दलाने विमानांच्या लँडिंगसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार त्यांना परवानगी देण्यात आली. नियमित सरावासाठी हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण केल्याचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairforceहवाईदल