शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

औरंगाबाद जिल्ह्यातील कृषिपंपांना ‘एचव्हीडीएस’ प्रणालीतून लवकरच वीज मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:42 IST

जिल्ह्यातील ९ हजार ८३३ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीजजोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ हजार ८३३ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीजजोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी १३१ कोटी १६ लाख रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत यापुढे एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. 

वीजपुरवठा खंडित होण्याच्या नेहमीच्या कटकटीतून ‘एचव्हीडीएस’ प्रणालीमुळे शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १३१ कोटी १६ लाख रुपयांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या रोहित्रांची खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुुख्यालयाकडून यापूर्वीच सुरू केली आहे. यानुसार जिल्ह्यात १० केव्हीए क्षमतेची ९ हजार ३०२ रोहित्रे, १६ केव्हीए क्षमतेची १६४ रोहित्रे आणि २५ केव्हीए क्षमतेची १८ रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. 

उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदेसध्या ६५ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांना वीजपुरवठा केला जातो. नवीन उच्चदाब प्रणालीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी तसेच वीज हानीसुद्धा कमी होणार आहे. या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरी करता येणार नाही.नव्या प्रणालीवर एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत तीनच कृषिपंपांना वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळेल.

यामध्ये ज्या शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यासाठी ०.४ कि.मी.पेक्षा अधिक उच्चदाब वाहिनी टाकावी लागणार आहे किंवा जोडणीसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लागणार आहे, अशा शेतकऱ्यांना ‘आॅफ ग्रीड सोलर सिस्टीम’द्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरण