शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'स्मार्ट ग्राम'मध्ये स्थापन झालेली 'कृषी अवजारे बँक' अनेक शेतकऱ्यांना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:03 IST

शेतकऱ्यांना सर्व प्रकाराची मशागतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकन्हेरवाडीत सुरू झाली कृषी अवजारे बँक...ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

- बालाजी आडसूळ कळंब (जि. उस्मानाबाद) : शेतकऱ्यांना मशागतीसाठी माफक दरात कृषी अवजारे उपलब्ध व्हावीत याकरीता स्मार्ट ग्राम कन्हेरवाडी ग्रामपंचायतने गावात अभिनव अशी ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन केली आहे. या बँकेतून मल्चिंग यंत्रापासून ते कीटकनाशकांच्या फवारणीसाठीचे फवारे असे विविध साहित्य शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तालुक्यातील कन्हेरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामविकास समितीने मागील काही वर्षात गावातील भौतिक विकास व मानवी निर्देशांकात वृद्धी व्हावी यासाठी व्यापक काम केले आहे. यामुळेच गावातील नागरिकांसाठी ‘आदर्श’ ठरलेल्या या गावास राज्य शासनानेही ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार देवून गौरव केला आहे. गावातील रस्ते, शाळा, परिसर विकासात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आदर्श गावाचा कित्ता गिरविणाऱ्या या गावाने आता कृषी विकासाकडेही जाणिवपूर्वक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. याच संकल्पनेतून राज्यात आगळा वेगळा असा ‘कृषि अवजारे बँक’ स्थापन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. याकामी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. रामराजे जाधव, सरंपच वर्षा रामराजे जाधव, उपसरपंच मुंकूद मिटकरी व सर्व सदस्यांनी मूर्त स्वरूप देण्यासाठी पावले उचलली.

याकरिता ग्रामपंचायतला वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीचा सदुपयोग करण्याचा निर्णय झाला. यानुसार कृषी  उपजिविका अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना सर्व प्रकाराची मशागतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातील मध्यम व अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  व अंतर्गत मशागतीसाठी अनेक कृषी अवजारांची गरज भासते. अशा शेतकऱ्यांना प्रगत तंत्राचा अवलंब करणं आर्थिकस्थितीमुळे शक्य नसतं. या शेतकऱ्यांना माफक दरात कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी ग्रापने पुढाकार घेतला आहे.

विविध प्रकारच्या यंत्राचा समावेश...कन्हेरवाडी ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या कृषी अवजारे बँकेत शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी व कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक विविध यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. यात अत्याधुनिक बैल पेरणी यंत्र, भोद व मल्चिंग यंत्र, ३० केव्हीए क्षमतेचा व ३ पंप चालू शकतील असा अल्टरनेट डायनामा, तीर्री, पंजी, इंजिन, हात व बॅटरीवरील फवारे आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी नाममात्र भाडे आकारले जाणार आहे, असे अ‍ॅड. रामराजे जाधव यांनी सांगितले.

राज्यातील अभिनव उपक्रम....कन्हेरवाडी ग्रामपंचायतीने गावातील शेतकऱ्यांना सर्वप्रकारची कृषी अवजारे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी सुरू केलेल्या ‘कृषी अवजारे बँके’ चा शुभारंभ नुकताच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांची प्रमूख उपस्थीती होती. अशा प्रकारचा राज्यातील पहिला उपक्रम असल्याचा ग्रामपंचायतीचा दावा आहे.

यापूवीर्ही राबवले आहेत विविध उपक्रम...कन्हेरवाडी ग्रापंने घर तिथे शौचालय, भूमिगत गटार, सोलार हाय मास्ट, सर्व एलईडी पथदिवे, इलर्निंग व डिजीटल शाळा तथा अंगणवाडी, गावाला शुद्ध व थंड पाणी, ठिबकवर जोपालेली वृक्षवल्ली, सॅनीटरी नॅपकीन वेंडीग मशीन असे विविध उपक्रम राबवून गावाला ‘आदर्श ग्राम’ अशी ओळख करून दिली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रOsmanabadउस्मानाबाद