शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

समता परिषदेचे आक्रोश आंदोलन ठरले लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात यावी, ओबीसींचे स्थानिक ...

औरंगाबाद : ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात यावी, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे,ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, औरंगाबाद जिल्हा शाखेतर्फे मंगळवारी आकाशवाणी चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. ते लक्षवेधी ठरले.

जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळ यांची बदनामी आम्ही कदापिही सहन करणार नसल्याचा इशारा देत घोडके यांनी सांगितले की, मराठा समाजाला मिळावे ही समता परिषदेची प्रामाणिक भूमिका आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. या आंदोलनानिमित्त झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पार्वताबाई शिरसाट या होत्या.

.........................................

जो ओबीसी हित की बात करेगा....

जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एकच चळवळ, छगन भुजबळ, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमा सभास्थळी ठेवण्यात आल्या होत्या.

........................

छगन भुजबळ यांचा चेहरा....

समता परिषदेचे कार्यकर्ते गजानन सोनवणे, अमोल तुपे, चंद्रकांत पेहरकर, गणेश काळे आदींनी विविध पेहराव केला होता. तीन कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा मुखवटा लावून लक्ष वेधले. आंदोलकांच्या डोक्यावर मी ओबीसी अशी अक्षरे कोरलेल्या टोप्या होत्या. शिवाय हाताला काळी फीत लावली होती.

माजी नगरसेविका कीर्ती शिंदे, सरस्वती हरकळ, जयराम साळुंके, एल. एम. पवार, हिरामण चव्हाण, महादेव आंधळे, प्रा. सुदाम चिंचाणे, मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, प्राचार्य सरोज नवपुते आदींची यावेळी भाषणे झाली. राजाभाऊ शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी सुरेश बनसोड, निशांत पवार, वामन भागवत, साईनाथ करवंदे, प्रकाश शिरसे, योगेश हेकाडे, संदीप घोडके, अर्जुन गाडेकर, राजेंद्र दारुंटे, सचिन गोरे, देवीदास सोनवणे, अमोल कुदळे, विनायक पाराशर, प्रशांत वाणी, ज्ञानेश्वर जेजूरकर, बाबासाहेब जाधव, अशोक गोरे, शिवानंद झोरे, अनिता देवतकर, सुभद्रा जाधव, द्वारका पवार, रोहिणी काळे, विलास गाडेकर, साळूबा पांडव, संजय फटाकडे, गणेश अंबेकर, सीमा नाईक, आबासाहेब शिरसाठ, नारायण फाळके, संजय कुदळे आदी प्रमुख कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.