शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

एजंटला अटक, तपास एलसीबीकडे वर्ग

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

नांदेड : नाशिक येथील केबीसी ग्रुप आॅफ कंपनीमध्ये पैसे गुंतवायला लावून संबंधितांना सुमारे सव्वाकोटी रुपयांना फसविल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला.

नांदेड : नाशिक येथील केबीसी ग्रुप आॅफ कंपनीमध्ये पैसे गुंतवायला लावून संबंधितांना सुमारे सव्वाकोटी रुपयांना फसविल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित एजंटला वजिराबाद पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग करण्यात आल्याची अधिकृत माहिती आहे. केबीसी कंपनीचा घोटाळा संपूर्ण राज्यात गाजतो आहे. कंपनीने प्रत्येक शहरात कमीशन एजंट नियुक्त करुन त्यांना तीन वर्षांत रक्कम दुप्पट करुन देण्याचे योजनाबद्ध कार्यक्रम आखून दिला. जनतेकडून पैसे गोळा करुन कंपनीमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी संबंधित एजंटवर होती. गुरुद्वारा व परिसरातील एजंट म्हणून गुरुसागरसिंघ दयालसिंघ सुखमनी काम पाहत होते. ते गुरुद्वारा बोर्डाचे सेवानिवृत्त अकाऊंटंट आॅडीटर आहेत. सुखमणी यांनी गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी, नातेवाईक, मित्रमंडळी अशांना विश्वासात घेवून त्यांना केबीसीचे सभासद होण्यास भाग पाडले. १७ हजार २०० रुपये घेवून १० हजारांची पावती त्यांनी दिली. ८६ हजार रुपये घेवून ५० हजारांची पावती दिली. यासंदर्भात संबंधित सभासदांनी विचारणा केली असता केबीसी मल्टीट्रेड कंपनी आहे. उर्वरीत रक्कम दुसऱ्या खात्यात भरली जात आहे. मात्र तीन वर्षानंतर तुम्हाला ठरलेली रक्कम व्याजासह परत केली जाईल, असे आश्वासन दिल्याने सुखमणी यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी पैसे गुंतविले. एकूण ३०१ जणांचे सव्वा कोटी रुपये सुखमणी यांच्याकडे लोकांनी गुंतविले.जानेवारी २०१२ पासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. अचानक फेब्रुवारी २०१४ मध्ये केबीसीमध्ये बेकायदेशीर काय चालू आहे? हे तपासण्याच्या नावाखाली काही पुढाऱ्यांनी चौकशीचा ससेमीरा कंपनीच्या मागे लावला. केबीसीच्या महाराष्ट्र बँकेतील ७८ कोटी व एसबीआय बँकेतील ३४ कोटी रुपये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सील केले, असे सर्व एजंटांना कंपनीतर्फे सांगण्यात आले. म्हणून रक्कम कमी झाली आणि कंपनीने सभासदांना पैसे परत करणे बंद केले. तेव्हा आपण फसल्या गेलो, याची उपरती अनेकांना झाली आणि पाच-सहा जणांनी मराठवाड्यात आत्महत्याही केल्या आहेत. नांदेड गुरुद्वारा बोर्डातील माजी कर्मचारी स. गगणसिंघ नारायणसिंघ यांनी यासंदर्भात १७ जुलै रोजी वजिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद देवून सुखमणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून २४ जुलै रोजी सुखमणी यांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. वजिराबादचे सहाय्यक फौजदार एस.पी. गायकवाड यांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला. आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. (प्रतिनिधी)