शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

बँकेसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:43 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. यात ६६0२५ जणांवर ३६२.४0 कोटींची थकबाकी आहे. तर २०१६ मध्ये नियमित व्यवहार करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांना ओ. टी. एस. करता येणार आहे. यात १0६८७ शेतकºयांवर २९२.९४ कोटी कर्ज आहे. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना किसान क्रेडीट कार्डचा खाते क्रमांक गरजेचा असल्याने सोमवारी तर शेतकºयांनी बँकेसमोर पहाटे सहा वाजल्यापासून लांबलचक रांगा लावल्या होत्या. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी विविध केंद्रांवर एकच गर्दी करीत आहेत. अद्यापपर्यंत ७९ हजार ३५७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली तर ६२ हजार ३५८ शेतकºयांचे अर्ज सादर झाले आहेत. त्या- त्या थकबाकीदार शेतकºयांचे अर्जांची तपासणी संबंधित बँकेकडून करणे सुरू आहे. अर्ज केलेला शेतकरी निकषात बसतो की नाही, कोणत्या अटी-शर्तीत बसतो. बसत असेल तरच सदरील शेतकºयाचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जात आहे. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक छाननी होईल. त्यानंतर १६ सप्टेंंबर रोजी तालुकास्तरावर समिती व बँकेचे अधिकारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करतील. त्यात पात्र शेतकरीच पुढे कर्जमाफीच्या कसोटीवर उतरतील. मात्र संपूर्ण महाराष्टÑात अर्ज भरण्यासाठी एकच वेबसाईट उपलब्ध असल्याने दोन- दोन दिवस वेबसाईटच उघडत नाही. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत कर्जमाफीचे अर्ज भरले जातील का? असा सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे १ आॅक्टोबर रोजी शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने अर्ज भरण्याचे काम करावे लागणार आहे. तर बंद असलेले केंद्रही सुरु केल्यास शेतकºयांना लाभ मिळण्यास मदत होईल. आजघडीला रात्री अपरात्री विविध केंद्रावर अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर केंद्रावर पैसे घेत असल्याच्या होत असलेल्या चर्चेची ही बारकाईने तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबधंक म्हेत्रेवार यांनी सांगितले.