शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:43 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. यात ६६0२५ जणांवर ३६२.४0 कोटींची थकबाकी आहे. तर २०१६ मध्ये नियमित व्यवहार करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांना ओ. टी. एस. करता येणार आहे. यात १0६८७ शेतकºयांवर २९२.९४ कोटी कर्ज आहे. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना किसान क्रेडीट कार्डचा खाते क्रमांक गरजेचा असल्याने सोमवारी तर शेतकºयांनी बँकेसमोर पहाटे सहा वाजल्यापासून लांबलचक रांगा लावल्या होत्या. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी विविध केंद्रांवर एकच गर्दी करीत आहेत. अद्यापपर्यंत ७९ हजार ३५७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली तर ६२ हजार ३५८ शेतकºयांचे अर्ज सादर झाले आहेत. त्या- त्या थकबाकीदार शेतकºयांचे अर्जांची तपासणी संबंधित बँकेकडून करणे सुरू आहे. अर्ज केलेला शेतकरी निकषात बसतो की नाही, कोणत्या अटी-शर्तीत बसतो. बसत असेल तरच सदरील शेतकºयाचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जात आहे. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक छाननी होईल. त्यानंतर १६ सप्टेंंबर रोजी तालुकास्तरावर समिती व बँकेचे अधिकारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करतील. त्यात पात्र शेतकरीच पुढे कर्जमाफीच्या कसोटीवर उतरतील. मात्र संपूर्ण महाराष्टÑात अर्ज भरण्यासाठी एकच वेबसाईट उपलब्ध असल्याने दोन- दोन दिवस वेबसाईटच उघडत नाही. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत कर्जमाफीचे अर्ज भरले जातील का? असा सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे १ आॅक्टोबर रोजी शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने अर्ज भरण्याचे काम करावे लागणार आहे. तर बंद असलेले केंद्रही सुरु केल्यास शेतकºयांना लाभ मिळण्यास मदत होईल. आजघडीला रात्री अपरात्री विविध केंद्रावर अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर केंद्रावर पैसे घेत असल्याच्या होत असलेल्या चर्चेची ही बारकाईने तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबधंक म्हेत्रेवार यांनी सांगितले.