शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

बँकेसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:43 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. यात ६६0२५ जणांवर ३६२.४0 कोटींची थकबाकी आहे. तर २०१६ मध्ये नियमित व्यवहार करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांना ओ. टी. एस. करता येणार आहे. यात १0६८७ शेतकºयांवर २९२.९४ कोटी कर्ज आहे. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना किसान क्रेडीट कार्डचा खाते क्रमांक गरजेचा असल्याने सोमवारी तर शेतकºयांनी बँकेसमोर पहाटे सहा वाजल्यापासून लांबलचक रांगा लावल्या होत्या. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी विविध केंद्रांवर एकच गर्दी करीत आहेत. अद्यापपर्यंत ७९ हजार ३५७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली तर ६२ हजार ३५८ शेतकºयांचे अर्ज सादर झाले आहेत. त्या- त्या थकबाकीदार शेतकºयांचे अर्जांची तपासणी संबंधित बँकेकडून करणे सुरू आहे. अर्ज केलेला शेतकरी निकषात बसतो की नाही, कोणत्या अटी-शर्तीत बसतो. बसत असेल तरच सदरील शेतकºयाचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जात आहे. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक छाननी होईल. त्यानंतर १६ सप्टेंंबर रोजी तालुकास्तरावर समिती व बँकेचे अधिकारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करतील. त्यात पात्र शेतकरीच पुढे कर्जमाफीच्या कसोटीवर उतरतील. मात्र संपूर्ण महाराष्टÑात अर्ज भरण्यासाठी एकच वेबसाईट उपलब्ध असल्याने दोन- दोन दिवस वेबसाईटच उघडत नाही. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत कर्जमाफीचे अर्ज भरले जातील का? असा सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे १ आॅक्टोबर रोजी शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने अर्ज भरण्याचे काम करावे लागणार आहे. तर बंद असलेले केंद्रही सुरु केल्यास शेतकºयांना लाभ मिळण्यास मदत होईल. आजघडीला रात्री अपरात्री विविध केंद्रावर अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर केंद्रावर पैसे घेत असल्याच्या होत असलेल्या चर्चेची ही बारकाईने तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबधंक म्हेत्रेवार यांनी सांगितले.