शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

पुन्हा अतिक्रमण

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही महिन्यापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही महिन्यापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते मात्र आता जैसे थे स्थिती झाली असून वाहतूक कोंडी व अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे अतिक्रमण हटाव पथकाचे दुर्लक्ष होत आहे.काही महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांमुळे महामार्ग अरूंद झाला आहे. तसेच यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत होते. असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालिकेने महामार्गांवरील अतिक्रमणावर हातोडा फिरविला होता. त्यानंतर काही दिवस महामार्गाने मोकळा श्वास घेतला. वाहतूक कोंडीही झाली नाही. अपघातालाही आळा बसला होता. मात्र आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. यापूर्वी या अतिक्रमणामुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहराला बायपास व उड्डाणपूल नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. त्यातच अतिक्रमणाने यामध्ये भर टाकली आहे. ही अतिक्रमणे हटवावीत यासाठी अनेक वेळा सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली, मोर्चे काढले. तात्पुरती अतिक्रमणेही हटविण्यात आली. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने पालिका, सा.बां. विभाग व पोलीस प्रशासनाचा या अतिक्रमणधारकांवर किती वचक आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. छोटे- मोठे हातगाडेवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत.या अतिक्रमणांमुळे साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जालनारोड, नगररोड, नगरनाका, बार्शीनाका, बार्शीरोड आदी मुख्य ठिकाणी सर्रास वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही कोंडी सोडविताना नाकीनऊ येतात. यातच अपघातही घडत आहेत. यासाठी ही अतिक्रमणे हटवून महामार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांमधून व वाहनधारकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)