शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पुन्हा अतिक्रमण

By admin | Updated: February 20, 2015 00:09 IST

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही महिन्यापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. काही महिन्यापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते मात्र आता जैसे थे स्थिती झाली असून वाहतूक कोंडी व अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे अतिक्रमण हटाव पथकाचे दुर्लक्ष होत आहे.काही महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांमुळे महामार्ग अरूंद झाला आहे. तसेच यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत होते. असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालिकेने महामार्गांवरील अतिक्रमणावर हातोडा फिरविला होता. त्यानंतर काही दिवस महामार्गाने मोकळा श्वास घेतला. वाहतूक कोंडीही झाली नाही. अपघातालाही आळा बसला होता. मात्र आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. यापूर्वी या अतिक्रमणामुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहराला बायपास व उड्डाणपूल नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. त्यातच अतिक्रमणाने यामध्ये भर टाकली आहे. ही अतिक्रमणे हटवावीत यासाठी अनेक वेळा सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली, मोर्चे काढले. तात्पुरती अतिक्रमणेही हटविण्यात आली. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने पालिका, सा.बां. विभाग व पोलीस प्रशासनाचा या अतिक्रमणधारकांवर किती वचक आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. छोटे- मोठे हातगाडेवाल्यांसह दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत.या अतिक्रमणांमुळे साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जालनारोड, नगररोड, नगरनाका, बार्शीनाका, बार्शीरोड आदी मुख्य ठिकाणी सर्रास वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही कोंडी सोडविताना नाकीनऊ येतात. यातच अपघातही घडत आहेत. यासाठी ही अतिक्रमणे हटवून महामार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांमधून व वाहनधारकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)