शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

कोरोना उद्रेकाचा परिणाम; लसीकरण केल्यानंतरही २१ जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:45 IST

corona virus in Aurangabad लसीकरणानंतर कोरोना संसर्ग कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 

ठळक मुद्देकाही जण पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित तर काही जण दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत पॉझिटिव्ह

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार वाढल्याने भीतीने असंख्य नागरिक लस घेत आहेत. संसर्ग वाढत असतानाच लसीकरण झालेले रुग्णही पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. लस घेतलेले आतापर्यंत २१ जण कोरोना बाधित झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरणाची मोहीम तीव्र करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शहरात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ट नागरिक, आजारी व्यक्तींना लस दिली जात आहे. १६ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ४६ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणानंतर कोरोना संसर्ग कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या डॉ. जोगदंड यांनी सांगितले की, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर घ्यायचा आहे. त्यानंतर १४ दिवसानंतर ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईल. त्यानंतर ७० टक्क्यांपर्यंत लस घेतलेल्या व्यक्तींना संरक्षण मिळेल. त्यामुळे लस घेणे प्रत्येकाच्या फायद्याचेच आहे.

काही जण पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झाल्याचे तर काही जण दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. लसीकरणानंतर ७० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळणार आहे. ३० टक्के धोका आहे. दोन डोस घेतल्यानंतरही जरी कोरोना संसर्ग झाला तरी जीवाला धोका राहणार नाही. सौम्य स्वरूपाचा त्रास असेल. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे डॉ. जोगदंड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद