शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 21:52 IST

: शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद : शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ८ जानेवारी २०१५ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत या तीन वर्षांत कदम आणि खा. खैरे यांच्यात धोरणात्मक वादासह संघटना आणि विकासकामांच्या विविध योजनांवरून वाद झाले. तीन वर्षांत झालेल्या या वादामुळे पक्षात दोन गट पडले. ही उचलबांगडी गटबाजीतून अथवा वादातून झाल्याचे दिसून येऊ नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याची गुलाबराव पाटील, नांदेडची रामदास कदम, तर औरंगाबादची डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून तसे परिपत्रकदेखील जारी झाले आहे. पालकमंत्री म्हणून पहिल्याच बैठकीत कदम यांनी समांतर जलवाहिनीच्या योजनेवर बोट ठेवले. ही योजना शहरासाठी घातक असल्याचा आरोप करीत मनपातील शहर अभियंता, आयुक्तांवर शरसंधान करीत खा. खैरे यांचे आर्थिक बलस्थान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू केला. येथूनच नाराजीचा सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे गाजत राहिला. मीच नेता आहे, दुसरे कुणीही नाही, असे बोलून कदम यांनी खैरे यांना डिवचले. मनपातील पदांचे निर्णय, जिल्हा नियोजन समितीत घेतलेल्या निर्णयांमुळे खैरेंसह त्यांच्या गटातील खदखद वाढत गेली. पालकमंत्र्यांनी काही विशिष्ट समुदायाचे नगरसेवक जवळ केल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत राहिला. परिणामी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचेही पालकमंत्र्यांसोबत कधीही जमले नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाºयांनी कदम यांच्यांशी जवळीक केली. त्या पदाधिकाºयांना पालकमंत्री बदलल्याचे पचनी पडलेले नाही. खा. खैरेंसोबत ज्यांचे वाद झाले, ते सर्व कदमांच्या जवळ गेले. आता कदमांची उचलबांगडी झाल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांची लवकरच उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.तीन वर्षे गाजले वादग्रस्त वक्तव्यांनीऔरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, या शिवसेनेच्या राजकीय धोरणात्मक मुद्यावरून खैरे आणि कदम यांच्यात दोन टोकांची वक्तव्ये पुढे आली. त्यामुळे सोशल मीडियात वेगळे पडसाद उमटले. समांतर जलवाहिनीच्या योजनेबाबत खा. खैरे दक्षता समितीच्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेत गेले, तर कदम यांनी ती योजना घातक असल्याचे सांगून महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यावर टीका केली. पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली वक्तव्ये पक्षासाठी घरचा अहेर असल्याप्रमाणे आहेत, असे खा. खैरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाºयांनी मातोश्रीवर वारंवार सांगितले; परंतु त्यावर निर्णय होण्यास तीन वर्षे लागली. तीन वर्षे खा. खैरे आणि कदम यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यांनी गाजले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदम