शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 21:52 IST

: शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद : शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ८ जानेवारी २०१५ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत या तीन वर्षांत कदम आणि खा. खैरे यांच्यात धोरणात्मक वादासह संघटना आणि विकासकामांच्या विविध योजनांवरून वाद झाले. तीन वर्षांत झालेल्या या वादामुळे पक्षात दोन गट पडले. ही उचलबांगडी गटबाजीतून अथवा वादातून झाल्याचे दिसून येऊ नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याची गुलाबराव पाटील, नांदेडची रामदास कदम, तर औरंगाबादची डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून तसे परिपत्रकदेखील जारी झाले आहे. पालकमंत्री म्हणून पहिल्याच बैठकीत कदम यांनी समांतर जलवाहिनीच्या योजनेवर बोट ठेवले. ही योजना शहरासाठी घातक असल्याचा आरोप करीत मनपातील शहर अभियंता, आयुक्तांवर शरसंधान करीत खा. खैरे यांचे आर्थिक बलस्थान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू केला. येथूनच नाराजीचा सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे गाजत राहिला. मीच नेता आहे, दुसरे कुणीही नाही, असे बोलून कदम यांनी खैरे यांना डिवचले. मनपातील पदांचे निर्णय, जिल्हा नियोजन समितीत घेतलेल्या निर्णयांमुळे खैरेंसह त्यांच्या गटातील खदखद वाढत गेली. पालकमंत्र्यांनी काही विशिष्ट समुदायाचे नगरसेवक जवळ केल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत राहिला. परिणामी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचेही पालकमंत्र्यांसोबत कधीही जमले नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाºयांनी कदम यांच्यांशी जवळीक केली. त्या पदाधिकाºयांना पालकमंत्री बदलल्याचे पचनी पडलेले नाही. खा. खैरेंसोबत ज्यांचे वाद झाले, ते सर्व कदमांच्या जवळ गेले. आता कदमांची उचलबांगडी झाल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांची लवकरच उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.तीन वर्षे गाजले वादग्रस्त वक्तव्यांनीऔरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, या शिवसेनेच्या राजकीय धोरणात्मक मुद्यावरून खैरे आणि कदम यांच्यात दोन टोकांची वक्तव्ये पुढे आली. त्यामुळे सोशल मीडियात वेगळे पडसाद उमटले. समांतर जलवाहिनीच्या योजनेबाबत खा. खैरे दक्षता समितीच्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेत गेले, तर कदम यांनी ती योजना घातक असल्याचे सांगून महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यावर टीका केली. पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली वक्तव्ये पक्षासाठी घरचा अहेर असल्याप्रमाणे आहेत, असे खा. खैरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाºयांनी मातोश्रीवर वारंवार सांगितले; परंतु त्यावर निर्णय होण्यास तीन वर्षे लागली. तीन वर्षे खा. खैरे आणि कदम यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यांनी गाजले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदम