शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 21:52 IST

: शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद : शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ८ जानेवारी २०१५ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत या तीन वर्षांत कदम आणि खा. खैरे यांच्यात धोरणात्मक वादासह संघटना आणि विकासकामांच्या विविध योजनांवरून वाद झाले. तीन वर्षांत झालेल्या या वादामुळे पक्षात दोन गट पडले. ही उचलबांगडी गटबाजीतून अथवा वादातून झाल्याचे दिसून येऊ नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याची गुलाबराव पाटील, नांदेडची रामदास कदम, तर औरंगाबादची डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून तसे परिपत्रकदेखील जारी झाले आहे. पालकमंत्री म्हणून पहिल्याच बैठकीत कदम यांनी समांतर जलवाहिनीच्या योजनेवर बोट ठेवले. ही योजना शहरासाठी घातक असल्याचा आरोप करीत मनपातील शहर अभियंता, आयुक्तांवर शरसंधान करीत खा. खैरे यांचे आर्थिक बलस्थान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू केला. येथूनच नाराजीचा सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे गाजत राहिला. मीच नेता आहे, दुसरे कुणीही नाही, असे बोलून कदम यांनी खैरे यांना डिवचले. मनपातील पदांचे निर्णय, जिल्हा नियोजन समितीत घेतलेल्या निर्णयांमुळे खैरेंसह त्यांच्या गटातील खदखद वाढत गेली. पालकमंत्र्यांनी काही विशिष्ट समुदायाचे नगरसेवक जवळ केल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत राहिला. परिणामी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचेही पालकमंत्र्यांसोबत कधीही जमले नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाºयांनी कदम यांच्यांशी जवळीक केली. त्या पदाधिकाºयांना पालकमंत्री बदलल्याचे पचनी पडलेले नाही. खा. खैरेंसोबत ज्यांचे वाद झाले, ते सर्व कदमांच्या जवळ गेले. आता कदमांची उचलबांगडी झाल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांची लवकरच उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.तीन वर्षे गाजले वादग्रस्त वक्तव्यांनीऔरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, या शिवसेनेच्या राजकीय धोरणात्मक मुद्यावरून खैरे आणि कदम यांच्यात दोन टोकांची वक्तव्ये पुढे आली. त्यामुळे सोशल मीडियात वेगळे पडसाद उमटले. समांतर जलवाहिनीच्या योजनेबाबत खा. खैरे दक्षता समितीच्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेत गेले, तर कदम यांनी ती योजना घातक असल्याचे सांगून महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यावर टीका केली. पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली वक्तव्ये पक्षासाठी घरचा अहेर असल्याप्रमाणे आहेत, असे खा. खैरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाºयांनी मातोश्रीवर वारंवार सांगितले; परंतु त्यावर निर्णय होण्यास तीन वर्षे लागली. तीन वर्षे खा. खैरे आणि कदम यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यांनी गाजले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदम