शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तांत्रिक मंजुरीनंतर यादी शासनाकडे पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:39 IST

शासन निधीतून करायच्या १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यादी सत्ताधाºयांच्या खिशात असून, ती जाहीर करण्यात आलेली नाही. सुमारे ६५ रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी समोर आले. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने १०० कोटींच्या निधीतील रस्त्यांना निधी जाहीर झाल्यानंतर २० महिन्यांनी कामांना सुरुवात झाली आहे. ३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्त्यांचा नारळ फुटला.

ठळक मुद्दे१२५ कोटींचे रस्ते : यादी तयार, पण नावे अजूनही सत्ताधाऱ्यांच्या खिशात

औरंगाबाद : शासन निधीतून करायच्या १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यादी सत्ताधाºयांच्या खिशात असून, ती जाहीर करण्यात आलेली नाही. सुमारे ६५ रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी समोर आले. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने १०० कोटींच्या निधीतील रस्त्यांना निधी जाहीर झाल्यानंतर २० महिन्यांनी कामांना सुरुवात झाली आहे. ३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्त्यांचा नारळ फुटला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी सव्वाशे कोटींच्या निधीची घोषणा केली. त्या घोषणेनंतर शिवसेना-भाजप वाद सुरू झाल्याने यादी लांबणीवर पडली. तीन दिवसांपूर्वी चिकलठाणा विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाºयांना रस्त्यांच्या यादीची विचारणा केली होती. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी यादी अंतिम केली आहे. महापौरांनी सांगितले, सव्वाशे कोटींच्या निधीतून ६५ रस्त्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. पीएमसीकडून तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच यादी शासनाकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार यादी शासनाला पाठविण्यात येईल.रस्त्यांची यादी सत्ताधाºयांच्या खिशात६५ रस्त्यांमध्ये विकास आराखड्यातील महत्त्वाच्या वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे, असे महापौरांनी सांगितले. मात्र, रस्त्यांची नावे त्यांनी सांगितली नाहीत. त्यामुळे यादी अंतिम करताना दबावतंत्राचे राजकारण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थायी समितीची बैठक आजऔरंगाबाद : महापालिका स्थायी समितीची बैठक शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता आहे. या बैठकीत मनपाच्या अग्निशमन विभागासाठी पाच नवीन फायर वॉटर टेंडर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी ठेवला आहे. यासोबतच मोकाट कुत्रे पकडणाºया ब्लू क्रॉस एजन्सीने निधीअभावी काम बंद केले. यावर बैठकीत चर्चा होईल.सोमवारपासून आणखी सहा बस धावणारऔरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेतील पॅनसिटींतर्गत शहरात स्मार्ट बससेवा सुरू करण्यात आली आहे. कंपनीकडून ४३ बस प्राप्त झाल्या असून, त्यापैकी २३ बसच सुरू आहेत. त्यात आता आणखी सहा बसची भर पडणार आहे. सोमवार, १२ फेबु्रवारीपासून सहा बस सुरू होणार आहेत. या बस विद्यापीठगेट, पडेगाव-मिटमिटा, टीव्ही सेंटर या ठिकाणांहून सुरू करण्याची सूचना एसटी महामंडळाला करण्यात येणार आहेत, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. बसमधून मागील पंधरा दिवसांत शहरातील सुमारे साडेनऊ हजार प्रवाशांनी प्रवास केला, तर या बस साडेपाच हजार किलोमीटरपर्यंत धावल्या. सध्या सुरू असलेल्या २३ स्मार्ट बसमधून रोज १ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. पंधरा दिवसांत १५ लाख रुपये स्मार्ट बसच्या स्वतंत्र खात्यात जमा करण्यात आले आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा