शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

हजारो वृक्ष लावल्याने साताऱ्याचे उजाड, ओसाड माळरान झाले हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST

औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त ...

औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त झाले. या कॅम्पमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १३ वर्षात सातारा परिसरातील ओसाड माळरानावर हजारो झाडे लावली आणि जगविल्याने या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला.

देशातील संवेदनशील शहरामध्ये औरंगाबाद गणल्या जाते. विविध दंगली या शहराने अनुभवल्या. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहर पोलिसांना राज्य राखीव दलाची मदत घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य यांच्या सहभागातून औरंगाबाद येथील सातारा येथे भारत राखीव बटालियन हे सशस्त्र पोलीस बल उभारण्याची घोषणा २००५ साली झाली. सुमारे पावणे तीनशे एकर जमीन या दलासाठी देण्यात आली. डोंगराळ, ओसाड जमीन भारत बटालियनने ताब्यात घेतली. २००७ साली प्रथमच या बलासाठी भरती प्रक्रिया पार पडली. २०१० साली या बटालियनचे अधिकृत उद्घाटन झाले. तेव्हापासून ओसाड रानावनात वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. आज तेथे वेगवेगळी तीन उद्याने आहेत. बटालियनच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य कार्यालय, निवासस्थान आणि विविध मैदान परिसरात हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. हे वृक्ष आता मोठे झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रकारची झाडे येथे पहायला मिळतात. वृक्ष लागवडीची दखल घेऊन शासनाने भारत बटालियनला वनश्री पुरस्काराने गौरविले आहे. शिवाय दरवर्षी नवीन वृक्ष लागवड करणे आणि लावलेली झाडे जगविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे यास प्राधान्य असते.

चौकट

पाणी टंचाईवर मात

उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडत असल्याचे पाहून भूजल पातळी वाढविण्यासाठी बटालियन प्रशासनाने पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा निर्धार केला. परिसरात वाल्मीचे दोन तलाव होते. या तलावाशिवाय आणखी दोन तलाव तंत्रशुद्ध पद्धतीने बांधले. या तलावात वर्षभर पाणी साचून राहते. या पाण्यामुळे परिसरातील वन्य पशु,पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली. शिवाय परिरसरातील विविध तांडे आणि वसाहतींना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. दोन वर्षापासून भारत राखीव बटालियनच्या टँकरद्वारे त्यांना मोफत पाणी पुरवठा केला जातो.

परिसरात दोन तलाव बांधले, येथील प्रत्येक इमारतीचे जलपुनर्भरण केल्याने ही वसाहत पाण्याच्या बाबतीत स्वयंभू झाली.

-मधुकर सातपुते, समादेशक, भारत राखीव बटालियन, सातारा.