शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वृक्ष लावल्याने साताऱ्याचे उजाड, ओसाड माळरान झाले हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST

औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त ...

औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त झाले. या कॅम्पमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १३ वर्षात सातारा परिसरातील ओसाड माळरानावर हजारो झाडे लावली आणि जगविल्याने या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला.

देशातील संवेदनशील शहरामध्ये औरंगाबाद गणल्या जाते. विविध दंगली या शहराने अनुभवल्या. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहर पोलिसांना राज्य राखीव दलाची मदत घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य यांच्या सहभागातून औरंगाबाद येथील सातारा येथे भारत राखीव बटालियन हे सशस्त्र पोलीस बल उभारण्याची घोषणा २००५ साली झाली. सुमारे पावणे तीनशे एकर जमीन या दलासाठी देण्यात आली. डोंगराळ, ओसाड जमीन भारत बटालियनने ताब्यात घेतली. २००७ साली प्रथमच या बलासाठी भरती प्रक्रिया पार पडली. २०१० साली या बटालियनचे अधिकृत उद्घाटन झाले. तेव्हापासून ओसाड रानावनात वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. आज तेथे वेगवेगळी तीन उद्याने आहेत. बटालियनच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य कार्यालय, निवासस्थान आणि विविध मैदान परिसरात हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. हे वृक्ष आता मोठे झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रकारची झाडे येथे पहायला मिळतात. वृक्ष लागवडीची दखल घेऊन शासनाने भारत बटालियनला वनश्री पुरस्काराने गौरविले आहे. शिवाय दरवर्षी नवीन वृक्ष लागवड करणे आणि लावलेली झाडे जगविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे यास प्राधान्य असते.

चौकट

पाणी टंचाईवर मात

उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडत असल्याचे पाहून भूजल पातळी वाढविण्यासाठी बटालियन प्रशासनाने पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा निर्धार केला. परिसरात वाल्मीचे दोन तलाव होते. या तलावाशिवाय आणखी दोन तलाव तंत्रशुद्ध पद्धतीने बांधले. या तलावात वर्षभर पाणी साचून राहते. या पाण्यामुळे परिसरातील वन्य पशु,पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली. शिवाय परिरसरातील विविध तांडे आणि वसाहतींना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. दोन वर्षापासून भारत राखीव बटालियनच्या टँकरद्वारे त्यांना मोफत पाणी पुरवठा केला जातो.

परिसरात दोन तलाव बांधले, येथील प्रत्येक इमारतीचे जलपुनर्भरण केल्याने ही वसाहत पाण्याच्या बाबतीत स्वयंभू झाली.

-मधुकर सातपुते, समादेशक, भारत राखीव बटालियन, सातारा.