शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वृक्ष लावल्याने साताऱ्याचे उजाड, ओसाड माळरान झाले हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST

औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त ...

औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त झाले. या कॅम्पमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १३ वर्षात सातारा परिसरातील ओसाड माळरानावर हजारो झाडे लावली आणि जगविल्याने या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला.

देशातील संवेदनशील शहरामध्ये औरंगाबाद गणल्या जाते. विविध दंगली या शहराने अनुभवल्या. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहर पोलिसांना राज्य राखीव दलाची मदत घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य यांच्या सहभागातून औरंगाबाद येथील सातारा येथे भारत राखीव बटालियन हे सशस्त्र पोलीस बल उभारण्याची घोषणा २००५ साली झाली. सुमारे पावणे तीनशे एकर जमीन या दलासाठी देण्यात आली. डोंगराळ, ओसाड जमीन भारत बटालियनने ताब्यात घेतली. २००७ साली प्रथमच या बलासाठी भरती प्रक्रिया पार पडली. २०१० साली या बटालियनचे अधिकृत उद्घाटन झाले. तेव्हापासून ओसाड रानावनात वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. आज तेथे वेगवेगळी तीन उद्याने आहेत. बटालियनच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य कार्यालय, निवासस्थान आणि विविध मैदान परिसरात हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. हे वृक्ष आता मोठे झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रकारची झाडे येथे पहायला मिळतात. वृक्ष लागवडीची दखल घेऊन शासनाने भारत बटालियनला वनश्री पुरस्काराने गौरविले आहे. शिवाय दरवर्षी नवीन वृक्ष लागवड करणे आणि लावलेली झाडे जगविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे यास प्राधान्य असते.

चौकट

पाणी टंचाईवर मात

उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडत असल्याचे पाहून भूजल पातळी वाढविण्यासाठी बटालियन प्रशासनाने पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा निर्धार केला. परिसरात वाल्मीचे दोन तलाव होते. या तलावाशिवाय आणखी दोन तलाव तंत्रशुद्ध पद्धतीने बांधले. या तलावात वर्षभर पाणी साचून राहते. या पाण्यामुळे परिसरातील वन्य पशु,पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली. शिवाय परिरसरातील विविध तांडे आणि वसाहतींना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. दोन वर्षापासून भारत राखीव बटालियनच्या टँकरद्वारे त्यांना मोफत पाणी पुरवठा केला जातो.

परिसरात दोन तलाव बांधले, येथील प्रत्येक इमारतीचे जलपुनर्भरण केल्याने ही वसाहत पाण्याच्या बाबतीत स्वयंभू झाली.

-मधुकर सातपुते, समादेशक, भारत राखीव बटालियन, सातारा.