शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पालकांच्या तक्रारीनंतर पाणीप्रश्न सोडविला

By admin | Updated: July 6, 2014 00:15 IST

गोरेगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या बोअरवेलचे पाणी आटल्यामुळे आठ दिवसांपासून पाण्याअभावी विद्यार्थ्यांवर भटकंती करून तहान भागविण्याची वेळ आली.

गोरेगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या बोअरवेलचे पाणी आटल्यामुळे आठ दिवसांपासून पाण्याअभावी विद्यार्थ्यांवर भटकंती करून तहान भागविण्याची वेळ आली. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मुख्य रस्ता पार करावा लागत असल्याने अपघाताची शक्यता बळावल्याची तक्रार करीत पालकांनी या विरोधात आवाज उठविल्यानंतर मुख्याध्यापकांनी शनिवारी बोअरची दुरूस्ती करून घेतली. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जि.प.शाळेतील बोअरवेलचा पाणीसाठा आटला आहे. परिणामी आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी विद्यार्थ्यांना शाळेशेजारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे, हॉटेल्स, घरे इत्यादी ठिकाणी भटकंती करत तहान भागवावी लागत आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शाळेसमोरील वाहनांची वर्दळ असलेला मुख्य रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची घटना घडण्याची शक्यता बळावली असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.शाळेमध्ये पाणी व्यवस्थेसाठी विद्यार्थी-पालकांनी वारंवार मागणी केली. तसेच शाळेसमोरून गेलेल्या खाजगी बोअरवेलला पाईप जोडणी करून मोफत पाणी घेण्याची पर्यायी व्यवस्था सुचविली; परंतु सदर मुख्याध्यापकाने दुर्लक्ष करीत आठ दिवसांपासून चालढकलपणा केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याने मुख्याध्यापकाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत असून शुक्रवारी पालकांनी थेट शाळा गाठली. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी मुख्याध्यापकाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पाण्यासाठी रस्त्यावर गेलेल्या विद्यार्थ्यासोबत दुर्घटना घडल्यास मुख्याध्यापकास जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे. निवेदनावर संतोष कावरखे, जगन कावरखे, शेख अहेमद, उद्धव कांबळे, सुरेश लहुळकर, आत्माराम, सय्यद दौलत, शेख शफी, मधुकर कावरखे, शेख मुराद, माधव मखमले, मधुकर कावरखे, केशव कावरखे, गौतम कांबळे, पवन कावरखे आदींंच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत मुख्याध्यापक आरू यांना विचारले असता, बोअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तो लक्षात आल्यानंतर दुरूस्ती केल्याने हा प्रश्न सुटल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)जि.प.शाळेतील प्रकारगोरेगाव येथील जि.प.शाळेतील बोअरवेलचा पाणीसाठा आटल्याचे सांगण्यात आले. परिणामी आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पाण्याअभावी विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी भटकावे लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. शाळेशेजारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे, हॉटेल्स, घरे इत्यादी ठिकाणी भटकंती करत विद्यार्थ्यांना आपली तहान भागवावी लागली. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शाळेसमोरील वाहनांची वर्दळ असलेला मुख्य रस्ता पार करावा लागत आहे. पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याने शुक्रवारी पालकांनी थेट शाळा गाठून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची त्वरीत व्यवस्था करण्याची मागणी केली.मुख्याध्यापकांनी तातडीने बोअरची दुरूस्ती केली असल्याचे सांगितले आहे.बोअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा त्यांनी केला.