शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

नांदेडनंतर आता मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत पळविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 23:26 IST

लातूर : मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे़

लातूर : मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे़ यापूर्वी मुंबई-लातूर ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता़ त्याला लातूरकरांनी तीव्र विरोध करून निर्णय हाणून पाडला़ मात्र आता पुन्हा रेल्वे प्रशासनाने बीदरपर्यंत ही रेल्वे विस्तारित करण्याचा घाट घातला आहे़ लातूर-मुंबई रेल्वेला लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत़ दररोज २०० ते ३०० प्रवाशांची वेटिंग असते़ उत्पन्नही मोठ्या प्रमाणात आहे़ प्रवाशांची लक्षणीय संख्या लक्षात घेता पाच बोगी वाढविण्याची मागणी लातूरकरांची असताना ही रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट घातला आहे़ तो लातूरकरांवर अन्यायकारक आहे़ बीदरसाठी हैदराबाद-पुणे, बीदर -मुंबई या गाड्या आठवड्यातून अनुक्रमे दोन, तीन वेळा धावतात़ पुन्हा आता मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न लातूरच्या जनतेने उपस्थित केला आहे़ शिवाय, बीदरहून लातूर-मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या नगण्य असताना लातूर-मुंबई रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत कशासाठी असा सवाल मराठवाडा जनता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी उपस्थित केला आहे़ मुंबई-लातूर रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत करायचा असेल तर यशवंतपूर-बीदरपर्यंत करणे आवश्यक आहे़ मात्र असा विचार रेल्वे प्रशासनाचा दिसत नाही़ पुणेपर्यंत रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्रालयाकडे प्रलंबित आहे़ रेल्वे ट्रॅकच्याही मागण्या प्रलंबित आहेत़ या मागण्यांचा विचार न करता थेट लातूर- मुंबई रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत करणे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय आहे़ या अन्यायाच्या विरोधात लातूरकर जनांदोलन करून दूर करतील, असा इशारा शिवाजी नरहरे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे़