शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
4
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
5
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
6
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
10
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
11
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
12
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
13
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
14
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
15
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
16
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
17
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
18
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
19
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
20
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

नांदेडनंतर आता मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत पळविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 23:26 IST

लातूर : मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे़

लातूर : मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे़ यापूर्वी मुंबई-लातूर ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता़ त्याला लातूरकरांनी तीव्र विरोध करून निर्णय हाणून पाडला़ मात्र आता पुन्हा रेल्वे प्रशासनाने बीदरपर्यंत ही रेल्वे विस्तारित करण्याचा घाट घातला आहे़ लातूर-मुंबई रेल्वेला लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत़ दररोज २०० ते ३०० प्रवाशांची वेटिंग असते़ उत्पन्नही मोठ्या प्रमाणात आहे़ प्रवाशांची लक्षणीय संख्या लक्षात घेता पाच बोगी वाढविण्याची मागणी लातूरकरांची असताना ही रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट घातला आहे़ तो लातूरकरांवर अन्यायकारक आहे़ बीदरसाठी हैदराबाद-पुणे, बीदर -मुंबई या गाड्या आठवड्यातून अनुक्रमे दोन, तीन वेळा धावतात़ पुन्हा आता मुंबई-लातूर रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न लातूरच्या जनतेने उपस्थित केला आहे़ शिवाय, बीदरहून लातूर-मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या नगण्य असताना लातूर-मुंबई रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत कशासाठी असा सवाल मराठवाडा जनता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी उपस्थित केला आहे़ मुंबई-लातूर रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत करायचा असेल तर यशवंतपूर-बीदरपर्यंत करणे आवश्यक आहे़ मात्र असा विचार रेल्वे प्रशासनाचा दिसत नाही़ पुणेपर्यंत रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्रालयाकडे प्रलंबित आहे़ रेल्वे ट्रॅकच्याही मागण्या प्रलंबित आहेत़ या मागण्यांचा विचार न करता थेट लातूर- मुंबई रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत करणे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय आहे़ या अन्यायाच्या विरोधात लातूरकर जनांदोलन करून दूर करतील, असा इशारा शिवाजी नरहरे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे़