शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 31, 2023 19:07 IST

छत्रपती संभाजीनगरच्या जवळ भालगावात आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली श्रीराम-सीतेची मूर्ती

छत्रपती संभाजीनगर : शहराकडून बीडकडे जाताना अवघ्या २० किमी अंतरावर भालगावात श्री रामचंद्र मठ आहे. जिथे समर्थ रामदास स्वामींंनी स्वत: ३९३ वर्षांपूर्वी श्रीराम व सीतेच्या मूर्तीची स्थापना केली. येथील मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘वामांकारूढ सीता’ म्हणजे रामाच्या मांडीवर बसलेली सीतेची पंचधातूची दुर्मीळ अशी मूर्ती आहे.

भालगावात एकीकडे काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. त्याच्या पूर्व बाजूस भालगावात जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. तो रस्ता सरळ श्रीरामचंद्र मठापर्यंत जाऊन पोहोचतो. डाव्या बाजूस एक जुना चिरेबंदी वाडा दिसतो. तोच श्री रामदास स्वामींनी स्थापित केलेला ‘श्री रामचंद्र मठ’ आहे. या मठात एका गाभाऱ्यात काळ्या सागवानी लाकडाचे मोठे देवघर दिसते. त्याच देवघरात श्रीराम व सीतेची पंचधातूची मूर्ती नजरेस पडते. याशिवाय श्रीरामाच्या उजव्या बाजूला हनुमान, तर सीतेच्या डाव्या बाजूला गरुडाची मूर्तीही लक्ष वेधून घेते. त्यानंतर बालाजी, देवीच्या मूर्ती येथे आहे. देवघराच्या दोन्ही बाजूला पितळाची ५ फुटी समई तसेच समोरील बाजूस दगड्याच्या समई दिसतात. याच मंदिरात काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव असतो.

देशात दोनच मूर्तीश्रीरामरक्षा स्तोत्रमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ‘ वामांकारूढ सीता’ १) भालगाव येथील श्रीरामचंद्र मठातील हीच ती श्रीराम-सीतेची पंचधातूची मूर्ती.२) श्री रामचंद्र मठाचा चिरेबंदी वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार. म्हणजे श्रीरामाच्या मांडीवर बसलेली सीता अशी पहिली मूर्ती जालना जिल्ह्यातील ‘जांब’ या त्यांच्या जन्मस्थानी व दुसरी मूर्ती छत्रपती संभाजीनगरातील भालगाव येथे आहे.

११०० मठांपैकी एक भालगावातस्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी देशभरात ११०० ठिकाणी मठाची स्थापना केली होती. त्यातील एक भालगावचा श्रीरामचंद्र मठ आहे. हा मठ सुकना नदीच्या काठावर उभारला आहे. त्याकाळी निजामाची खडकी (छत्रपती संभाजीनगर) ही राजधानी असल्याने येथील राजकीय हालचालींवर लक्ष रहावे, या हेतूने स्वामींनी भालगावात मठ उभारला होता.

त्र्यंबकराज हे मठाचे पहिले महंतभालगावात श्रीरामचंद्र मठाची स्थापना करून श्री रामदास स्वामी यांनी त्यांचे पट्ट शिष्यांपैकी एक असलेले त्र्यंबकराज (भोळाराम) यांना मठाचा महंत नेमून ते पुढे टाकळीला रवाना झाले. भोळाराम यांच्या नावावरून नंतर या गावाला भालगाव नाव पडले. त्यांच्या नंतर हरिहर देशमुख, रघुवीर स्वामी, खंडेराव स्वामी असे महंत झालेत. सध्याचे सुरेश स्वामी जहागिरदार हे नवव्या पिढीतील आहेत. आता या कुटुंबाची दहावी पिढी आपल्या पूर्वजांचा धार्मिक वारसा पुढे नेत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक