शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 31, 2023 19:07 IST

छत्रपती संभाजीनगरच्या जवळ भालगावात आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली श्रीराम-सीतेची मूर्ती

छत्रपती संभाजीनगर : शहराकडून बीडकडे जाताना अवघ्या २० किमी अंतरावर भालगावात श्री रामचंद्र मठ आहे. जिथे समर्थ रामदास स्वामींंनी स्वत: ३९३ वर्षांपूर्वी श्रीराम व सीतेच्या मूर्तीची स्थापना केली. येथील मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘वामांकारूढ सीता’ म्हणजे रामाच्या मांडीवर बसलेली सीतेची पंचधातूची दुर्मीळ अशी मूर्ती आहे.

भालगावात एकीकडे काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. त्याच्या पूर्व बाजूस भालगावात जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. तो रस्ता सरळ श्रीरामचंद्र मठापर्यंत जाऊन पोहोचतो. डाव्या बाजूस एक जुना चिरेबंदी वाडा दिसतो. तोच श्री रामदास स्वामींनी स्थापित केलेला ‘श्री रामचंद्र मठ’ आहे. या मठात एका गाभाऱ्यात काळ्या सागवानी लाकडाचे मोठे देवघर दिसते. त्याच देवघरात श्रीराम व सीतेची पंचधातूची मूर्ती नजरेस पडते. याशिवाय श्रीरामाच्या उजव्या बाजूला हनुमान, तर सीतेच्या डाव्या बाजूला गरुडाची मूर्तीही लक्ष वेधून घेते. त्यानंतर बालाजी, देवीच्या मूर्ती येथे आहे. देवघराच्या दोन्ही बाजूला पितळाची ५ फुटी समई तसेच समोरील बाजूस दगड्याच्या समई दिसतात. याच मंदिरात काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव असतो.

देशात दोनच मूर्तीश्रीरामरक्षा स्तोत्रमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ‘ वामांकारूढ सीता’ १) भालगाव येथील श्रीरामचंद्र मठातील हीच ती श्रीराम-सीतेची पंचधातूची मूर्ती.२) श्री रामचंद्र मठाचा चिरेबंदी वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार. म्हणजे श्रीरामाच्या मांडीवर बसलेली सीता अशी पहिली मूर्ती जालना जिल्ह्यातील ‘जांब’ या त्यांच्या जन्मस्थानी व दुसरी मूर्ती छत्रपती संभाजीनगरातील भालगाव येथे आहे.

११०० मठांपैकी एक भालगावातस्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी देशभरात ११०० ठिकाणी मठाची स्थापना केली होती. त्यातील एक भालगावचा श्रीरामचंद्र मठ आहे. हा मठ सुकना नदीच्या काठावर उभारला आहे. त्याकाळी निजामाची खडकी (छत्रपती संभाजीनगर) ही राजधानी असल्याने येथील राजकीय हालचालींवर लक्ष रहावे, या हेतूने स्वामींनी भालगावात मठ उभारला होता.

त्र्यंबकराज हे मठाचे पहिले महंतभालगावात श्रीरामचंद्र मठाची स्थापना करून श्री रामदास स्वामी यांनी त्यांचे पट्ट शिष्यांपैकी एक असलेले त्र्यंबकराज (भोळाराम) यांना मठाचा महंत नेमून ते पुढे टाकळीला रवाना झाले. भोळाराम यांच्या नावावरून नंतर या गावाला भालगाव नाव पडले. त्यांच्या नंतर हरिहर देशमुख, रघुवीर स्वामी, खंडेराव स्वामी असे महंत झालेत. सध्याचे सुरेश स्वामी जहागिरदार हे नवव्या पिढीतील आहेत. आता या कुटुंबाची दहावी पिढी आपल्या पूर्वजांचा धार्मिक वारसा पुढे नेत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक