शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ‘गो एअर’चे विमान दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:41 IST

चार खाजगी बसने प्रवासी रात्री उशिरा मुंबईला रवाना

ठळक मुद्देरविवारी सायंकाळी अचानक आपत्कालीन लँडिंग

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झालेले गो एअर कंपनीचे पाटणा-मुंबई विमान सोमवारी पाच तासांच्या प्रयत्नांनंतर दुरुस्त होऊन दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या विमानातील प्रवासी रविवारी रात्री उशिरा चार खाजगी बसने मुंबईला गेले. 

पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावली होती. अशा परिस्थितीत विमानातील वातानुकूलित यंत्रणाही बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. परंतु वैमानिकाने प्रसंगावधान राखून औरंगाबादेत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे १६४ प्रवासी बालंबाल बचावले. या सगळ्या परिस्थितीनंतर प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.

गो एअरची कोणतीही व्यवस्था नसल्याने एअर इंडियाच्या यंत्रणेची मदत घेण्यात आली. विमानातून उतरल्यानंतर विमानतळावर प्रवाशांच्या अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. विमान दुरुस्त होईल अथवा अन्य विमानाची सोय होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर या दोन्हीपैकी काहीही झाले नाही. विमान दुरुस्तीसाठी कंपनीचे अभियंते, तंत्रज्ञांना येण्यास विलंब झाला. अशा परिस्थितीत प्रवाशांना खाजगी बसने मुंबईला नेण्याचे नियोजन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चार खाजगी बसद्वारे प्रवासी रवाना झाला. मुंबईच्या प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकशी होणारचिकलठाणा विमानतळावर लँडिंग झाल्यानंतरही वैमानिक विमानातच बसून वरिष्ठ पातळीवर संवाद साधत होते. सोमवारी सकाळी सहा वाजता दाखल झालेल्या इंजिनिअर, तंत्रज्ञांनी विमान दुरुस्त केले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे विमान मुंबईकडे झेपावले. जे वैमानिक आले होते, त्यांनीच विमान नेले. या सगळ्या घटनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणार असल्याचीही माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमानtourismपर्यटन