शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

सत्तांतरानंतर शहर झाले जीटीएलमुक्त

By admin | Updated: November 18, 2014 01:12 IST

अशोक कारके , औरंगाबाद केंद्रात, राज्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर झाले की, त्याचे पडसाद विविध क्षेत्रांत आणि विविध ठिकाणी उमटतात.

अशोक कारके , औरंगाबादकेंद्रात, राज्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर झाले की, त्याचे पडसाद विविध क्षेत्रांत आणि विविध ठिकाणी उमटतात. त्याचा प्रत्यय शहरात दिसून येत आहे. राज्यातील सत्तांतराचा पहिला इफेक्ट औरंगाबादेत जीटीएलवर होणाऱ्या कारवाईतून दिसून येत आहे.केंद्रात भाजपाच्या मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सत्तांतर होईल, असे चित्र निर्माण झाले होते. त्याप्रमाणे राज्यात सत्तांतर झाले. त्याचे परिणाम हळूहळू दिसून येऊ लागले आहेत. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या आशीर्वादाने महावितरणकडून शहरातील वीजपुरवठ्याचे काम जीटीएलला २०११ मध्ये देण्यात आले होते. आघाडी सरकारच्या काळात महावितरण आणि जीटीएलमध्ये वीज बिलाच्या थकबाकीमुळे अनेक वेळा खटके उडाले; पण राजकीय दबावामुळे जीटीएलवर कारवाई झाली नाही. आघाडी सरकारच्या काळातही जीटीएलकडे महावितरणची थकबाकी होती. त्यासाठी पहिली नोटीस ८ मे २०१४ रोजी जीटीएलला देण्यात आली होती; पण जीटीएलने नोटिसीला गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर राज्यात सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली. महावितरणने १७ सष्टेंबर रोजी प्राथमिक करार रद्द करण्यासाठी दुसरी नोटीस दिली. त्यानंतर पुन्हा १३ दिवसांनी तिसरी प्राथमिक करार रद्द करण्याची नोटीस जीटीएलला देण्यात आली. जीटीएलच्या अधिकाऱ्यांनी राजकीय आशीर्वाद असल्यामुळे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले; पण यावेळी राज्यात सत्तांतर झाले होते. त्याचा परिणाम १० नोव्हेंबर रोजी जीटीएलला अंतिम करार रद्द करण्याच्या नोटिसीमधून दिसून आला. नोटिसीनंतर जीटीएल कायम करण्यासाठी राजकीय प्रयत्न झाले; पण सत्तांतर झाल्यामुळे त्या प्रयत्नांना अपयश आले.शहरात जीटीएल राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या रुचीने आली. सत्तांतर झाले की, कंपनीला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस देण्यात आली होती. अखेर औरंगाबादकर शनिवारी दुपारीच जीटीएलमुक्त झाले. जीटीएलचे कंत्राट रद्द केल्यामुळे राष्ट्रवादीला हा पहिला झटका असल्याची चर्चा होत आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांतराचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जीटीएलकडील थकबाकीच्या वसुलीची प्रक्रिया अधिक वेगात सुरू झाली. १ नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळ्यानंतर महावितरणने कायदेशीर करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर १० नोव्हेंबर रोजी अंतिम नोटीस देऊन १५ नोव्हेंबर रोजी वीजपुरवठ्याचा ताबा घेतला.महावितरण आणि जीटीएलचे कर्मचारी-अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी सत्तांतरामुळे शहर जीटीएलमुक्त झाले असे खाजगीत बोलताना मान्य करीत आहेत.शहरात जीटीएल आणतेवेळी बारामती आणि नांदेडमध्ये वीज गळती अधिक होती; पण त्या ठिकाणी फ्रँचायजी देण्यात आली नाही. त्यामागेही राजकीय कारण होते. आताही आहे.- अरुण पिवळ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ