शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री बदलल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वनियोजित अनेक कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:48 IST

जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपासह जिल्ह्यात विविध २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातील कामांना ब्रेक लागला आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपासह जिल्ह्यात विविध २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातील कामांना ब्रेक लागला आहे. 

जानेवारी २०१८ मध्ये पालकमंत्री कदम यांच्या जागी डॉ. दीपक  सावंत यांच्यावर पदाची जबाबदारी देण्यात आली. आठ महिन्यांत सावंत यांनी पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी नियोजित केलेल्या कामांचा साधा आढावाही घेतला नसल्याची ओरड सुरू आहे.  जिल्हा नियोजन समितीतून पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी देऊनही बहुतांश कामे रेंगाळली आहेत. अडीच वर्षांपासून कुठलेही काम गतीने पूर्ण केलेले नाही. 

नियोजित केलेल्या कामांचे प्रस्ताव पुढे येण्यासाठी वर्षामागून वर्षे जात आहेत, तरीही कामे पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रहालयाचे दुसऱ्या टप्प्याचे काम रेंगाळले आहे. विमानतळासमोर लेण्यांचे म्युरल्स लावण्याच्या कामाला गती आलेली नाही. चिकलठाणा येथील २०० बेड्सच्या हॉस्पिटलला पाणीपुरवठा करण्याचे काम आजवर झालेले नाही. दरम्यान, त्या हॉस्पिटलचे लोकार्पणही आजवर झालेले नाही.

सफारी पार्कसाठी जिल्हा प्रशासनाने मनपाच्या ताब्यात जागा दिली आहे; परंतु सफारी पार्कबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. ५० खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचे कामही रेंगाळले आहे. जिल्हा नियोजन समितीने त्या कामासाठी अनुदान दिले; परंतु पालकमंत्री बदलताच त्या कामालाही ग्रहण लागले. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचे काम पुढे का सरकत नाही.

संत एकनाथ रंगमंदिरासाठी समिती गठित करून मुंबईतील कालिदास नाट्यगृहाप्रमाणे ते सुशोभित करण्याबाबतच्या प्रस्तावानुसार २ कोटी रुपये संत एकनाथ रंगमंदिरासाठी डीपीसीतून मंजूर करण्यात आले. त्यानुसार सध्या काम सुरू आहे. जांभूळवनामध्ये केलेल्या वृक्षारोपणाकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. कटकटगेटमधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची कामे रखडली आहेत. डीपीसीने निधी दिलेल्या हॉस्पिटल्सची कामे रेंगाळली आहेत. शासकीय दूध डेअरीची जागा हॉस्पिटल्ससाठी ताब्यात आली नाही. पर्यटनस्थळ विकास कार्यक्रम ठप्प पडलेला आहे. कटकटगेट परिसरात हॉस्पिटलसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली; मात्र तेही रेंगाळले आहे. 

समित्यांच्या बैठका नाहीत, नियुक्त्या रखडल्याजिल्हा पातळीवर अशासकीय सदस्यांच्या ६० समित्या आहेत. त्यातील बहुतांश समित्यांची एकही बैठक आजवर झालेली नाही, तसेच विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या नियुक्त्यादेखील देण्यात आलेल्या नाहीत. निवडणुकांसाठी १ वर्ष राहिले असून, किमान आता तरी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदguardian ministerपालक मंत्रीRamdas Kadamरामदास कदम