शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

४१८ वर्षानंतर मजुरांची दिवाळी गावात

By admin | Updated: October 25, 2014 23:49 IST

संजय तिपाले , बीड एकीकडे दिवाळीचा धूमधडाका तर दुसरीकडे दिवाळीपूर्वीच संसार पाठीवर घेऊन कारखान्याचा रस्ता पकडणारे ऊसतोड मजूर... हे नेहमीचे चित्र यंदा नाही.

संजय तिपाले , बीडएकीकडे दिवाळीचा धूमधडाका तर दुसरीकडे दिवाळीपूर्वीच संसार पाठीवर घेऊन कारखान्याचा रस्ता पकडणारे ऊसतोड मजूर... हे नेहमीचे चित्र यंदा नाही. विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सहा लाख ऊसतोड मजुरांनी कोयते म्यान केले आहेत. संपामुळे १८ वर्षानंतर पहिल्यांदाच मजुरांनी गावी दिवाळी साजरी केली. या मजुरांना नव्या सरकारची प्रतीक्षा आहे.विजयादशमीनंतर ऊसतोड मजुरांना हंगामाचे वेध लागतात. मजुरांच्या स्थलांतराने गावच्या गावे रिकामी होतात. त्याचा परिणाम बाजारपेठेवरही होतो. अर्थकारणावर थेट परिणाम करणाऱ्या स्थलांतराला यावेळी ‘ब्रेक’ बसला तो मजुरांच्या आंदोलनाने! प्रलंबित मागण्यांसाठी संप सुरु असल्याने यावेळी दिवाळीच्या सणातही मजुरांनी गाव सोडले नाही. बिऱ्हाड पाठीवर घेऊन रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करणाऱ्या मजुरांची दिवाळी आतापर्यंत फडातच साजरी व्हायची. एकीकडे दिव्यांचा झगमगाट, गोडधोड पदार्थांची रेलचेल, नवे कोरे कपडे, फटाक्यांची आतषबाजी... अशी धूमधडाक्यात दिवाळी साजरी होत असतानाच दिवाळीतही ऊसतोड मजुरांच्या हातचा कोयता काही सुटत नव्हता. पाचटापासून बनविलेल्या कोप्यांमध्ये अंधार मिटविण्यासाठी पेटविलेला कंदिलच दिवाळीतील दिव्याची भूमिका बजवायचा... अंगावर फाटके कपडे, भाकरी-ठेच्यामध्येच सुख शोधायचे अन् कोयत्याच्या घावानंतर निघालेल्या आवाजाला फटाक्यांचा आवाज समजून समाधान मानायचे... दिवाळीतही उपेक्षित जिणे जगणाऱ्या ऊसतोड मजुरांना यंदा मात्र, सणाचा आनंद आपल्या गावात अन् स्वत:च्या कुटुंबियांसमवेत साजरा करता आला. वयोवृद्ध गावाकडे अन् तरुण मुले, सुना ऊसतोडीला... यामुळे दिवाळी साजरी करणार तरी कशी? असे कोडे ऊसतोड मजूर कुटुंबियांपुढे असायचे;परंतु यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित होते.नव्या सरकारकडून अपेक्षाऊसतोड मजुरांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य केल्याशिवाय एकही मजूर गाव सोडणार नाही. आम्ही मजुरांना घ्यायला आलेली वाहने अडवून त्यांना रोखून ठेवले आहे. नव्या सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. सरकारस्थापनेनंतर आम्ही आमची मागणी त्यांच्यापुढे ठेवणार आहोत. तोपर्यंत संप सुरुच राहील असे, ऊसतोड कामगार संघटनेचे राज्य सचिव श्रीरंग भांगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.१९९६ मध्ये झाले होतेव्यापक आंदोलनयापूर्वी १९९६ मध्ये ऊसतोड मजुरांचे व्यापक आंदोलन झाले होते. तेंव्हा युतीचे सरकार होते. गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत होते. मजुरांच्या आंदोलनानंतर मुंडे यांनी त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी ‘खुर्ची गेली तरी चालेल;परंतु माझ्या ऊसतोड मजुरांना न्याय मिळाला पाहिजे’ अशी आग्रही भूमिका घेतली होती. त्यानंतर मजुरांच्या मागण्या मान्य झाल्या होत्या. आंदोलनामुळे तेंव्हा मजुरांना गावातच दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर एकदाही मजूर दिवाळीत गावी नव्हते. संपाने यंदा गावातील दिवाळीचा योग पुन्हा आला.४कोयत्यावर पोट भरणाऱ्या सहा लाख मजुरांचा जगण्याचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरु आहे. ४पिढ्यामागून पिढ्या ऊसतोडीची कष्टाची कामे करण्यात गेल्या;परंतु मजुरांच्या हातातील कोयता काही दूर झाला नाही. ४ऊसतोड मजुरांच्या मागण्याही फार मोठ्या नाहीत;परंतु ऊसतोड मजुरांना आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही.४‘व्होट बँक’ म्हणून त्यांच्या मतांवर मात्र अनेकांनी खुर्च्या उबविल्या, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट यांनी व्यक्त केली.उसतोड कामगारांना हार्वेस्टिंगप्रमाणे एक टन उसतोडणीला ४०० रुपये मजुरी द्यावी़४मुकादमांच्या कमिशनमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ करावी़४ऊस वाहतुकीमध्ये तिप्पट वाढ करावी़४उसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे़४कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळांना मान्यता द्यावी़४उसतोड कामगारांना वीमा मंजूर करण्यात यावा़